शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

यवतमाळ येथील किसान महापंचायत होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ येथे २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ येथे २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या किसान महापंचायतला (शेतकरी महामेळावा) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. परंतु आयोजकांनी कोरोनाच्या नियमानुसार सभा घेण्यासंदर्भात नव्याने अर्ज सादर केला आहे. हा अर्ज सध्या तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. परंतु यवतमाळची सभा ही कोरोनाचे नियम पाळून ठरलेल्या दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळी होईल आणि सभेला संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत हे मार्गदर्शनही करतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाचे विदर्भ संयोजक शेतकरी नेते श्रीकांत तराळ आणि महासंघाचे कोअर कमिटी सदस्य व महाराष्ट्राचे संयोजक संजय गिड्डे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केला.

तराळ आणि गिड्डे पाटील यांनी सांगितले की, दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे ते केवळ दोन-चार राज्यापुरते मर्यादित नाही, तर देशव्यापी आहे. हे सरकारला कळावे म्हणून देशात विविध ठिकाणी किसान महापंचायत होत आहे. महाराष्ट्रातही त्यासाठीच आयोजन करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा याच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात केली होती. याच ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, स्वामीनाथन आयोग पूर्णपणे लागू करण्याचे आणि एमएसपी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या सभेेसाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली. तब्बल एक लाख लोक येतील, असे नियोजन करण्यात आले. तयारीही पूर्ण झाली. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने थोडी अडचण आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या महासभेला परवानगी नाकारली. यासोबतच कोरोनाची नियमावली सादर केली. या कोरोनाच्या नियमावलीनुसार सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच नव्याने अर्ज सादर करण्यात आला आहे. अजून तरी हा अर्ज प्रलंबित आहे. परंतु प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पूर्वीसारखी सभा होणार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून सभा घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रपरिषदेला मलिकंतसिंग बल, सुनील चोखारे, भंते महेंद्र रत्न उपस्थित हाेते.