शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

खिंडसी ओव्हर फ्लो; शेकडो एकर शेती पाण्याखाली, पिकांचे मोठे नुकसान

By जितेंद्र ढवळे | Updated: September 27, 2023 15:50 IST

विद्यार्थ्यांनाही बसतोय फटका

नागपूर : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेक तालुक्यातील खिंडसी ओव्हर फ्लो झाला आहे. या ओव्हर फ्लोमुळे नजीकच्या पंचाळा नाल्याला पूर आला आहे. पुराचे पाणी नजीकच्या शेतात शिरल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नजीकच्या असोली येथील पुलावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका असोली येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बसतो आहे. याबाबत शासनाने त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांची भेट घेत उपरोक्त समस्यांकडे लक्ष वेधले.

रामटेक येथील खिंडसी प्रकल्पात पावसाळ्यात ६५ टक्के पाणी साठा होता. मात्र, २२ सप्टेंबरनंतर झालेल्या मुसळधार पावसाने हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. मांद्री पंचाळा (बु) भागातून खिंडसीचा सलांगमधून पाणी मोठ्या प्रमाणात वाहायला लागले. त्यामुळे पंचाळा, महादुला, घोटी, बेरडेपार, आसोली, शिवाडोगरी, मांद्री, भंडारबोडी, शिवारातील शेतात पुराचे पाणी घुसले. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आसोली-अरोली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे आसोली येथील आरोली येथे शिकायला जाणारे अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

गतवर्षी सुद्धा हा पूल तुटला होता; पण त्याची कायमस्वरूपी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढावा. खिंडसी प्रकल्पाचे पाणी कालव्यातून बाहेर सोडावे. ते सूर नदीद्वारे निघून जाईल. तसेच आरोली मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :RainपाऊसnagpurनागपूरCropपीक