शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

केरळ ते काश्मीर..एक थरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:50 IST

साधारणत: ‘आयपीएस’ अधिकारी म्हटले की एक साचेबद्ध जीवन असते, असा सर्वसाधारण समज आहे.

ठळक मुद्देविजय रमण यांनी उलगडली शौर्यगाथा : चंबळमध्ये डाकूंना घातले होते वेसण, एक अद्भूत कहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: ‘आयपीएस’ अधिकारी म्हटले की एक साचेबद्ध जीवन असते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र केरळपासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास ज्यावेळी चंबळ खोरे, पंतप्रधान निवासस्थान येथपासून ते थेट जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीयसीमारेषेपर्यंत येतो, तेव्हा निश्चितच त्या प्रवासात अनेक थरारक पैलू दडले असतात. स्वच्छ चारित्र्य, देशाभिमान, प्रामाणिक भावना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदू स्वभाव जपत आयुष्यभर देशसेवा करणाºया विजय रमण यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभावे असेच. आपल्या आयुष्यातील रोमांचक प्रसंग रमण यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान नागपुरातील नागरिकांसमोर मांडले आणि ऐकणाºयांच्या अंगावरदेखील शहारे आले.‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानावर आयोजित नागपूर दुर्गोत्सवात सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी विजय रमण यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, नागपूर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम् प्रामुख्याने उपस्थित होते. देविका नाडिग यांनी ही मुलाखत घेतली. १९८१ साली विजय रमण हे भिंड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते.त्या काळी तेथे डाकूंची दहशत होती. पानसिंग तोमर, मलखाम सिंग, फुलनदेवी यांचा दरारा होता. १ आॅक्टोबर १९८१ रोजी मला पानसिंग तोमर भिंडजवळील एका गावात लपल्याची माहिती मिळाली. अपुरी संख्या असतानादेखील आम्ही गावाला वेढा घातला. मी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गुरैय्या तसेच काही सहकाºयांसह गावात आमच्या इतर पोलिसांना माहिती न देता प्रवेश केला. मात्र अचानक डाकूंचा गोळीबार सुरू झाला. आम्ही गावात आहो याची माहिती नसलेल्या पोलिसांनी दुसºया बाजूने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. परीक्षेची घडी होती व आम्ही तेथेच संयम ठेवून थांबण्याचे ठरविले. सुमारे चार तास आम्ही गोळीबार झेलत होतो व अखेर मध्यरात्रीनंतर डाकूंचा खात्मा करण्यात यश आले. या ‘एन्काऊंटर’नंतर डाकूंमध्ये भय निर्माण झाले. मला मलखाम सिंगने धमक्यादेखील दिल्या. मात्र नंतर त्याने आत्मसमर्पण केले, असे रमण यांनी सांगितले.१९८५ मध्ये त्याने दिल्लीत येऊन माझ्या घरी भेट घेतली होती, अशी आठवण रमण यांनी सांगितली. जम्मू-काश्मीरमध्ये सांभाळलेली विशेष सुरक्षा पथक स्थापनेची जबाबदारी, जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेला कुंपण घालण्याची मोठी जबाबदारी तसेच संसदेवर हल्ला करणाºया गाझीबाबाच्या ‘एन्काऊंटर’ची मोहीम याबाबत अनेक रोचक तथ्य यावेळी रमण यांनी मांडले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले यांनी प्रास्ताविक केले. नीरज दोंतुलवार यांना संचालन केले. यावेळी विजय रमण यांच्या पत्नी वीणा रमण यांची विशेष उपस्थिती होती.अन् राजीव गांधी प्रभावित झालेमध्य प्रदेशात सुरक्षा ‘एआयजी’ असताना भोपाळ गॅसकांड झाले. यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अचानक दौरा ठरला. त्यावेळी कोणीच ‘एस्कॉर्ट’ अधिकारी नसल्याने माझ्याकडे ती जबाबदारी आली. ताफ्यात राजीव गांधींच्या गाडीच्या मागे माझी गाडी होती. मी अचानक ताफा थांबविला व राजीव गांधींच्या गाडीचा दरवाजा उघडला. त्यांची शाल दरवाजातून बाहेर आली होती. ती आत घेण्याची विनंती केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह हेदेखील गाडीत होते. त्या गाडीतील सुरक्षा अधिकाºयावर मी त्यांच्या उपस्थितीत ओरडलो व गाडीला आतून लॉक का केले नाही, असा प्रश्न केला. ही बाब राजीव गांधी यांनी हेरली व पुढे ‘एसपीजी’त (स्पेशल सिक्युरिटी फोर्स) माझी निवड झाली, असे विजय रमण यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे ते सुरक्षा नियंत्रक होते. राजीव गांधी अनेकदा अनेक बाबींवर त्यांचा सल्ला घ्यायचे. राजीव गांधी हे ‘मॅन आॅफ आयडियाज्’ होते. त्यांच्या कार्यकाळात ज्या काही चुका झाल्या, त्या त्यांच्यामुळे नव्हे तर त्यांच्या सल्लागारांमुळे झाल्या, असे प्रतिपादन यावेळी रमण यांनी केले. रमण यांनी राजीव गांधी यांच्यासमवेत व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर व पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सुरक्षेचीदेखील जबाबदारी सांभाळली होती.३९ दिवसांत जगप्रदक्षिणाएकीकडे सुरक्षेसाठी दिवस-रात्र एक करणाºया विजय रमण यांनी थक्क करणारी गोष्टदेखील सांगितली. १९९१ साली त्यांनी कॉन्टेसा या कारमधून जगप्रदक्षिणा केली होती. नवीन कपिला नावाच्या माझ्या मित्राने मला ही कल्पना सांगितली. आम्ही ३९ दिवस ७ तास व ५५ मिनिटांत ४० हजार ७५ किलोमीटरचा प्रवास केला. केवळ एकाच दिशेने प्रवास करायचा व एका खंडात किमान २ हजार किलोमीटर गाडी चालवायची अशी अट होती. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने या विक्रमाची नोंद केली होती, असे विजय रमण यांनी सांगितले.