शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कारखाने सुरू ठेवा, कामगारांना क्वारंटाईन करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:53 IST

एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.

ठळक मुद्देहिंगणा इंडस्ट्रीज असोसिएशनची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणीस्थलांतरित कामगारांच्या आरोग्याची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.शेगावकर म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांचा अहवाल नकारात्मक आढळल्यानंतरही आरोग्य विभाग कामगारांना १४ दिवस संस्थात्मक आणि १४ दिवस होम असे एकूण २८ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश देतात. ही बाब हिंगणा एमआयडीसीतील दोन कारखान्यांमध्ये घडली आहे. दोन्ही कारखान्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ते एक महिन्यासाठी बंद ठेवावे लागले. एका कारखान्यात ८ जूनला कोरोना रुग्ण आढळला होता. कारखाना हॉटस्पॉट घोषित केल्यानंतर आरोग्य विभागााचे अधिकारी कुणाचेही ऐकत नाही. कोरोना रुग्णाची माहिती जिल्हा, तहसील आणि आरोग्य विभागाला दिली होती. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या कार्यालयाला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी कोरोना रुग्णाच्या स्थितीत कारखाना पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून दोन ते तीन दिवस सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. पण दुर्दैवाने असे होत नाही. कामगारांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतरही त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात येत असल्याने खुद्द कामगारच कामावर येत नाही. त्यामुळे उत्पादन थांबते.चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना कामावर ठेवता येईल. कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करणे चुकीचे आहे. संबंधित आरोग्य विभागांना योग्य सूचना दिल्यानंतर असे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एक किंवा दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास आणि उर्वरित नकारात्मक असतील तर तीन दिवसात उत्पादन पुन्हा सुरू करता येईल. निगेटिव्ह आढळलेल्या कामगारांची संख्या कमी केली जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील माहिती सर्व उद्योजकांना द्यावी, असे ठाकरे म्हणाले.स्थलांतरित कामगार पुन्हा कामावर येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी करूनच कामावर ठेवण्यात येत आहे. संबंधित विभागाने कामगारांना घाबरवू नये, उत्पादन सुरू ठेवण्यास मदत करावी, असे शेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. चर्चेदरम्यान जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी