शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

कारखाने सुरू ठेवा, कामगारांना क्वारंटाईन करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:53 IST

एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.

ठळक मुद्देहिंगणा इंडस्ट्रीज असोसिएशनची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणीस्थलांतरित कामगारांच्या आरोग्याची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.शेगावकर म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांचा अहवाल नकारात्मक आढळल्यानंतरही आरोग्य विभाग कामगारांना १४ दिवस संस्थात्मक आणि १४ दिवस होम असे एकूण २८ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश देतात. ही बाब हिंगणा एमआयडीसीतील दोन कारखान्यांमध्ये घडली आहे. दोन्ही कारखान्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ते एक महिन्यासाठी बंद ठेवावे लागले. एका कारखान्यात ८ जूनला कोरोना रुग्ण आढळला होता. कारखाना हॉटस्पॉट घोषित केल्यानंतर आरोग्य विभागााचे अधिकारी कुणाचेही ऐकत नाही. कोरोना रुग्णाची माहिती जिल्हा, तहसील आणि आरोग्य विभागाला दिली होती. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या कार्यालयाला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी कोरोना रुग्णाच्या स्थितीत कारखाना पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून दोन ते तीन दिवस सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. पण दुर्दैवाने असे होत नाही. कामगारांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतरही त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात येत असल्याने खुद्द कामगारच कामावर येत नाही. त्यामुळे उत्पादन थांबते.चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना कामावर ठेवता येईल. कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करणे चुकीचे आहे. संबंधित आरोग्य विभागांना योग्य सूचना दिल्यानंतर असे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एक किंवा दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास आणि उर्वरित नकारात्मक असतील तर तीन दिवसात उत्पादन पुन्हा सुरू करता येईल. निगेटिव्ह आढळलेल्या कामगारांची संख्या कमी केली जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील माहिती सर्व उद्योजकांना द्यावी, असे ठाकरे म्हणाले.स्थलांतरित कामगार पुन्हा कामावर येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी करूनच कामावर ठेवण्यात येत आहे. संबंधित विभागाने कामगारांना घाबरवू नये, उत्पादन सुरू ठेवण्यास मदत करावी, असे शेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. चर्चेदरम्यान जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी