शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनावर जिवंत आहे काटोलची औद्योगिक वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST

सौरभ ढोरे काटोल : औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) शेतकऱ्यांकडून शेतजमिनी अधिग्रहित करताना स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांना चालना मिळावी, असा धोरणात्मक ...

सौरभ ढोरे

काटोल : औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) शेतकऱ्यांकडून शेतजमिनी अधिग्रहित करताना स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांना चालना मिळावी, असा धोरणात्मक हेतू होता. तालुक्यात उद्योग येतील या आशेने शेतकऱ्यांनी सरकारला वडिलोपार्जित जमिनी दिल्या. एमआयडीसीने या जागेचे भूखंड विविध कर व सवलतींसह उद्योजकांकडे हस्तांतरित केले. मात्र गत ३० वर्षात काटोल एमआयडीसीमध्ये ना मोठा उद्योग आला ना बेरोजगारांना रोजगार मिळाला. केवळ राजकीय आश्वासनाच्या बळावर काटोलची औद्योगिक वसाहत सध्या जिवंत आहे.

दिवंगत आ. सुनील शिंदे यांच्या कार्यकाळात काटोल तालुक्यात एमआयडीसीचे काम सुरू झाले. यानंतर येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला. मात्र तो काही वर्षात बंदही झाला. प्रदीर्घ कालखंडाचा विचार केल्यास काटोल एमआयडीसीत नवीन उद्योगांची भरभराट होऊन रोजगाराची व्याप्ती वाढली असती. मात्र तसे काहीएक झाले नाही. १९८९ ला १३८.४४ हेक्टर क्षेत्रात काटोल ‘एमआयडीसी’ ची स्थापना झाली. ३० वर्षाचा कालावधी होऊनही या भागातील लोकप्रतिनिधींना रोजगाराच्या दृष्टीने कोणताही मोठा उद्योग येथे आणण्यात यश आले नाही. मधल्या काळात प्रयत्न झाले. मात्र त्याचा पाठपुरावा बरोबर झाला नाही.

२०१७ मध्ये तत्कालीन आ. आशिष देशमुख यांनी एमआयडीसीला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. पतंजली योगपीठाचे आचार्य बाळकृष्णन यासाठी काटोल येथे येऊन गेले. त्यांची अतिरिक्त जागेची मागणी असल्याने विस्तारीकरणाचा प्रस्ताव सुद्धा पाठविण्यात आला. यात २०५.९१ हेक्टर विस्तारित जमीन एमआयडीसीच्या यादीत वाढविण्यात आली. याचे हस्तांतरण अंतिम टप्प्यात आले आहे. जमिनीचे क्षेत्रफळ जरी वाढले तरी मात्र आद्यप एकही मोठा उद्योग आजपर्यंत सुरु झालेला नाही.

सर्वात मोठा उद्योग पण रोजगार शून्य

१३८ हेक्टर क्षेत्रातील १०२ हेक्टर जमीन ही सोलार वीज निर्मिती करण्याकरिता इंडियन बुल्स या कंपनीला देण्यात आली. यामुळे मोठी रोजगार भरती होईल अशी आशा होती. मात्र हा सुद्धा रोजगार शून्य उद्योेग काटोलकरांच्या भाग्याला लाभला. महत्वाचे म्हणजे या कंपनीला देण्यात आलेली जागा अतिशय मोक्याची आहे. यामुळे छोट्या उद्योजकांना नवीन उद्योग उभारणीना विस्तारित जमिनीचा विकास होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

उद्योग सुरू नसूनही भूखंडावर कब्जा

अटी व शर्तीचे पालन करुन एमआयडीसी क्षेत्रात घेतलेल्या भूखंडावर पाच वर्षांत उद्योग सुरु करणे अनिवार्य आहे. अन्यथा हा भूखंड शासनाला परत करावा लागतो. मात्र जिल्ह्याबाहेरील अनेकांनी भूखंड मिळवून उद्योग सुरू केले नाही व भूखंडही शासनाला परत दिले नाही. येथे अनेकांनी भूखंड उद्योगविनाच ताब्यात ठेवले आहेत. याची चौकशी करून शासनाने भूखंड परत घ्यावे, अशी मागणी गरजू उद्योजक करीत आहेत.

---

गत ३० वर्षापासून काटोल एमआयडीसीत स्थानिकांना रोजगार देणारा एकही मोठा उद्योग सुरु झाला नाही. नवीन उद्योग आणण्यात आमचे लोकप्रतिनिधी नक्कीच कमी पडले आहेत.

- प्रफुल सातपुते, काटोल

-

राजकीय नेते मंडळी निवडणुका आल्या की नुसत्या थापा मारतात. हे गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे. निवडून आले की तेच नेते मंडळी उद्योग आणणे सोपे आहे का? अशी उलट उत्तरे देतात.

- नितीन चरपे, काटोल.