शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

महिला सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या ‘कस्तुरबा’; १५० वी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 10:26 IST

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहनदास करमचंद गांधी ते ‘महात्मा’ या प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या आयुष्यभर गांधीविचारांना जगल्या. महिलांना कमी लेखल्या जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेत. त्यांची ही तळमळ नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीने अनुभवली होती. १९३० साली मुलींच्या शाळेच्या उद्घाटनासाठी कस्तुरबा गांधी यांनी ...

ठळक मुद्देअडथळ्यांना पार करत पोहोचल्या होत्या पारशिवनीला‘कस्तुरबा भवन’ चालवतेय गांधी विचारांची परंपरा

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहनदास करमचंद गांधी ते ‘महात्मा’ या प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या आयुष्यभर गांधीविचारांना जगल्या. महिलांना कमी लेखल्या जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेत. त्यांची ही तळमळ नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीने अनुभवली होती. १९३० साली मुलींच्या शाळेच्या उद्घाटनासाठी कस्तुरबा गांधी यांनी विविध अडथळ्यांचा सामना केला होता व जिद्दीने त्या शाळेच्या उद्घाटनाला पोहोचल्या होत्या, हे विशेष. ही शाळा सुरू करणारे चिंतामणराव तिडके यांच्या कन्या सुधाताई गडकरी यांनी ही आठवण सांगितली.वर्धा आणि कस्तुरबा गांधी यांचे नाते अतुट होते व त्यांचे संस्कार बापूकुटीमध्ये जागोजागी रोवल्या गेले. मात्र वर्ध्यासोबतच नागपूर व आजूबाजूच्या परिसरातदेखील महात्मा गांधींसोबतच कस्तुरबा यांना आदर्श मानणारे अनेक जण होते. १९३० साली पारशिवनी येथे चिंतामणराव तिडके यांनी मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा मानस केला होता व शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मौलिक मार्गदर्शनासाठी कस्तुरबा गांधी यांनी येण्याचे वचन दिले होते. कस्तुरबा गांधी या शिकल्या नव्हत्या, मात्र साक्षरतेचे महत्त्व त्यांना चांगल्या रीतीने माहीत होते. देशभरात महात्मा गांधींसमवेत प्रवास करत असताना महिला सक्षमीकरण किती आवश्यक आहे, हे त्यांना कळले होते. त्यामुळेच पारशिवनीच्या शाळेचे निमंत्रण त्यांनी लगेच स्वीकारले होते. त्या काळी चांगले रस्ते नव्हते.आपली वचनपूर्ती करण्यासाठी व मुलींना नवा हुरूप देण्यासाठी कस्तुरबा यांना जानकीबाई बजाज, महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी गोमतीबाई बेन यांच्यासमवेत वर्ध्याहून पारशिवनीसाठी निघाल्या. रामटेकला पोहोचल्यानंतर रस्ता नसल्याने त्या जवळील गावापर्यंत नावेतून गेल्या. पावसाळ्याचे दिवस असतानादेखील त्यांनी त्यानंतर चिखलाने भरलेल्या रस्त्यातून कधी पायी तर कधी बैलगाडी, असा प्रवास करत पारशिवनी गाठले होते.

‘गांधी भवन’चे झाले ‘कस्तुरबा भवन’महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपुरातील बजाजनगरात गांधी भवन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला व विनोबा भावे यांच्या हस्ते १९६५ ला भूमिपूजन झाले होते. २ आॅक्टोबर १९६८ साली कमलाबाई होस्पेट यांच्या हस्ते कोनशिलान्यास झाला व जयप्रकाश नारायण यांनी उद्घाटन केले होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभागात गांधी भवन होते. त्यामुळे एकाच भागात दोन गांधी भवन असल्याने कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होते. त्यामुळे १९९० मध्ये या भवनाला कस्तुरबा भवन असे नाव देण्यात आले, अशी माहिती महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील यांनी दिली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी