शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा फॉम्युर्ला; काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांची 'लोकमत'शी विशेष बातचित

By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:18 IST

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसच्या विभागीय बैठका घेत आहेत.

नागपूर: लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रात कर्नाटक, तेलंगणाचा फॉम्युर्ला वापरला जाईल. काँग्रेस थेट जनतेत जाईल. लोकांच्या मनातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. सर्व नेत्यांना एकत्र करून त्यांच्यातील मतभेद दूर करून लोकांमध्ये एकतेचा मेसेज दिला जाईल. काँग्रेसचे जिंकण्यासाठी मैदानात उतरल्याचा मेसेज जनतेत गेला की लोकही काँग्रेसला साथ देऊन विजयी करतील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसच्या विभागीय बैठका घेत आहेत. गुरुवारी अमरावतीची बैठक आटोपल्यावर चेन्नीथला यांनी शुक्रवारी नागपुरात लोकमतशी विशेष बातचित केली. ते म्हणाले, उमेदवारीबाबत ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्याचे मतही ऐकूण घेतले जात आहे. थेट जनतेचे मतही विचारात घेतले जात आहे. मतदारांवर उमेदवार लादला जाणार नाही, जिंकण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल, याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. जागा वाटपाची पहिल्या टप्प्यातील चर्चा संपली आहे. ‘विनिंग फाम्युर्ला’ विचारात घेऊनच कोणती जागा कुणी लढवावी, हे निश्चित केले जाईल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बरेच लोक सोडून गेले. मात्र, त्याने काहीच फरक पडणार नाही. उलट या दोन नेत्यांचे जनसमर्थन वाढले आहे, असा दावाही चेन्नीथला यांनी केला. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

कुणीही काँग्रेस सोडून जाणार नाहीकाँग्रेसला कमजोर करण्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. मात्र, कितीही दबाव आला तरी कुणीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. यापूर्वी जे गेले ते स्वार्थासाठी गेले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्र लढले तर नेत्यांचाच फायदासध्या केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे नेत्यांना आपसात भांडून हाती काहीच लागणार नाही. एकत्र येऊन लढले व सत्ता आली तर नेत्यांनाच त्याचा फायदा होईल, असे सांगत चेन्नीथला यांनी गटबाजी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन सज्ज राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरूमहाविकास आघाडीत सामील होण्यासाठी सर्वांना दारे खुली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू आहे. सकारात्मक तोडगा निघेल, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

इतिहासात विदर्भाची साथ, म्हणूनच येथून सुरुवातइतिहासात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे विदर्भापासूनच आढावा बैठकांची सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती येथील बैठक आटोपली. शनिवारी गडचिरोली येथे बैठक होत आहे. राज्यभरात अशा सहा बैठका होतील.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस