शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष

By कमलेश वानखेडे | Updated: May 13, 2023 17:46 IST

Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे.

- कमलेश वानखेडे

नागपूर : कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. देशातील जनता भाजपला कंटाळली आहे, हे या निकालावरून स्पष्ट झाले, असे मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

देवडिया काँग्रेस भवनात शनिवारी शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात मिठाई वाटून कर्नाटकच्या विजयाचा आंनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. अभिजित वंजारी, बंटी शेळके, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, गजराज हटेवार, रमन पैगवार, प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे, वसिम खान, गुड्डू अग्रवाल, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.

यावेळी विलास मुत्तेमवार म्हणाले, कर्नाटकात कोणत्याही कामात ४० टक्के कमीशन घेण्यामुळे भाजप बदनाम जाली आहे. हिंदु मुस्लिम हा विषय लोकांनी नाकारला. हा धर्मिनरपेक्ष देश आहे. भाजपच्या धार्मिक विखारी प्रचाराला बळी न पडता लोकांना सावध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. अभिजंत वंजारी यांनी कर्नाटकात कुलगुरू बनविण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचे सांगत भ्रष्टाचाराची सीमा ओलांडल्याचे सांगितले.

कोराडी वीज प्रकल्पाच्या विस्तारास विरोध- कोराडी वीज प्रकल्पात पुन्हा ११२ मेगावॅटचे विस्तारित संच उभारण्यात येत आले. याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. काँग्रेसने या प्रकल्पात लक्ष देऊन जनहितासाठी विरोध करावा, असा ठराव विशाल मुत्तेमवार यांनी बैठकीत माडला व तो संमत करण्यात आला.

‘हाथ से हाथ जोडो’ निरीक्षकांवर नाराजी- ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान यशस्वी करण्यासाठी ब्लॉक स्तरावर निरीक्षक नेमले होते. या अभियानाच्या अंमलबजावणीचा वास्तिवक अहवाल बहुतांश निरीक्षकांनी शहर काँग्रेसकडे अद्याप सादर केलेला नाही. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली व आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

जनसमस्या समित्यांच्या प्रभाग अध्यक्ष नेमणारनागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचा महापालिका, नासुप्र व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्रभाग निहाय जनसमस्या निवारण समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. यासाठी २० मे नंर प्रत्येक प्रभागाची बैठक घेतली जाईल व या समित्यांसाठी प्रभागनिहाय अध्यक्ष नेमले जातील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकnagpurनागपूरcongressकाँग्रेस