शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Nagpur: कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष

By कमलेश वानखेडे | Updated: May 13, 2023 17:46 IST

Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे.

- कमलेश वानखेडे

नागपूर : कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. देशातील जनता भाजपला कंटाळली आहे, हे या निकालावरून स्पष्ट झाले, असे मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

देवडिया काँग्रेस भवनात शनिवारी शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात मिठाई वाटून कर्नाटकच्या विजयाचा आंनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. अभिजित वंजारी, बंटी शेळके, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, गजराज हटेवार, रमन पैगवार, प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे, वसिम खान, गुड्डू अग्रवाल, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.

यावेळी विलास मुत्तेमवार म्हणाले, कर्नाटकात कोणत्याही कामात ४० टक्के कमीशन घेण्यामुळे भाजप बदनाम जाली आहे. हिंदु मुस्लिम हा विषय लोकांनी नाकारला. हा धर्मिनरपेक्ष देश आहे. भाजपच्या धार्मिक विखारी प्रचाराला बळी न पडता लोकांना सावध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. अभिजंत वंजारी यांनी कर्नाटकात कुलगुरू बनविण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचे सांगत भ्रष्टाचाराची सीमा ओलांडल्याचे सांगितले.

कोराडी वीज प्रकल्पाच्या विस्तारास विरोध- कोराडी वीज प्रकल्पात पुन्हा ११२ मेगावॅटचे विस्तारित संच उभारण्यात येत आले. याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. काँग्रेसने या प्रकल्पात लक्ष देऊन जनहितासाठी विरोध करावा, असा ठराव विशाल मुत्तेमवार यांनी बैठकीत माडला व तो संमत करण्यात आला.

‘हाथ से हाथ जोडो’ निरीक्षकांवर नाराजी- ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान यशस्वी करण्यासाठी ब्लॉक स्तरावर निरीक्षक नेमले होते. या अभियानाच्या अंमलबजावणीचा वास्तिवक अहवाल बहुतांश निरीक्षकांनी शहर काँग्रेसकडे अद्याप सादर केलेला नाही. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली व आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

जनसमस्या समित्यांच्या प्रभाग अध्यक्ष नेमणारनागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचा महापालिका, नासुप्र व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्रभाग निहाय जनसमस्या निवारण समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. यासाठी २० मे नंर प्रत्येक प्रभागाची बैठक घेतली जाईल व या समित्यांसाठी प्रभागनिहाय अध्यक्ष नेमले जातील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकnagpurनागपूरcongressकाँग्रेस