शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अमित शहांसमोर खोटे बोलले, जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 07:54 IST

बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अमित शहांनी मध्यस्थी केली असली, तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्यासमोर खोटं बोलल्याचा दावा जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला.  

बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्विट्सही चर्चेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेतली. याच बैठकीत बोम्मई यांनी वाद निर्माण करणारं ट्विट फेक असल्याचा दावा केला होता. या मुद्द्यावरून बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी उपरोक्त दावा केला. मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून संबंधितांची बदनामी होत असल्याचा मुद्दा बुधवारी अधिवेशनात चर्चेला आला. त्यावर चर्चा होत असताना, ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड आहे की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा अशोक चव्हाण यांनी मांडला.   

जर महाराष्ट्राबाबत चिथावणी देणाऱ्या गोष्टी त्या अकाउंटवर असतील, तर आपण त्यावर काय भूमिका घेणार? ते व्हेरिफाइड अकाउंट आहे. त्यामुळे ते फेक आहे, असं सांगून आपण त्याची पाठराखण का करायची?, असा सवाल चव्हाण यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितलंय. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेन’, असे सांगितले.    

जयंत पाटील यांचा दावा ‘बोम्मईंनी जे ट्विट केलंय, त्याबाबत कर्नाटकच्या विधानसभेत तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्यांनी आपल्या ट्विट्सपासून घुमजाव का केलं? असा आक्षेप कर्नाटकच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे बोम्मईंचं ट्विट खरंच आहे. ते गृहमंत्र्यांसमोर जे बोलले, ते खरं नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे’, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

फडणवीसांचा टोला  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला. ‘जयंत पाटील यांनी या विधानसभेत जास्त लक्ष द्यावं. कर्नाटकच्या विधानसभेत कमी लक्ष द्यावं. तिथे काय घडलं, याची खात्रीशीर माहिती घेऊ आणि मग त्यावर चर्चा करू’, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस