शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:24 IST

‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.

ठळक मुद्देसुरांच्या अत्युच्च शिखरावर कालिदास महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.शास्त्रीय संगीतासह उपशास्त्रीय ठुमरी, दादरा असे रसिले प्रकार व हिंदी सिनेमातील पार्श्वगायनासह घराघरात पोहचलेल्या या पद्मभूषण परवीन यांचा खास चाहता वर्ग सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा त्यांच्या स्वरांची गोड अनुभूती घेण्यासाठी रसिकांनी सुरेश भट सभागृहात प्रचंड गर्दी केली होती. आसाम ही जन्मभूमी व मुंबई-महाराष्ट्र ही कर्मभूमी मानणाऱ्या बेगम परवीन यांनी सुरुवातीलाच चोखंदळ रसिक अशी ओळख असलेल्या नागपूरकर रसिकांच्या प्रेमाचे आभार मानत ‘राग मारुविहाग’ने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. बालवयापासून नाद व सुरांच्या उद्यानात बागडणाऱ्या परवीन सुलताना यांच्यात पतियाळा व किराणा घराण्याच्या संमिश्र स्वरांची रागिणी वाहते. तीनही सप्तकात सहज फिरणारा गाजदार स्वर, लहान-मोठ्या तानांची वर्तुळे व सरगमची उधळण त्यांनी रसिकांवर केली. विलंबित एकतालातील ‘कैसे विन साजन...’ व द्रुत तीन तालातील ‘गवन न किजो...’ या बंदिशीसह त्यांनी रागविस्तार केला. पुढे राग ‘मालुहामांड’मध्ये झपतालातील बंदिश व तीन तालातील तराणा अशांसह त्यांनी आपले गायन कळसाला पोहचविले. खास श्रोत्यांच्या आग्रहावर मिश्र तिलंग रागातील ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते...’ ही मराठीतील रचना त्यांनी सादर करून बहारदार समापन केले.त्यांना तबल्यावर मुकुंदराज देव, हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, तानपुऱ्यावर ऋतुजा व शीतल यांनी सुरेल साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर आणि रेणुका देशकर यांनी केले. ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते.गडकरी यांच्या संदेशाने हृदय समापनकालिदास महोत्सवाच्या समापनाच्या औपचारिक कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे एमडी अभिमन्यू काळे, आयकर सहआयुक्त मुरारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओद्वारे संदेश दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या सादरीकरणाने हा महोत्सव देशभर परिचित झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत