शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:24 IST

‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.

ठळक मुद्देसुरांच्या अत्युच्च शिखरावर कालिदास महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.शास्त्रीय संगीतासह उपशास्त्रीय ठुमरी, दादरा असे रसिले प्रकार व हिंदी सिनेमातील पार्श्वगायनासह घराघरात पोहचलेल्या या पद्मभूषण परवीन यांचा खास चाहता वर्ग सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा त्यांच्या स्वरांची गोड अनुभूती घेण्यासाठी रसिकांनी सुरेश भट सभागृहात प्रचंड गर्दी केली होती. आसाम ही जन्मभूमी व मुंबई-महाराष्ट्र ही कर्मभूमी मानणाऱ्या बेगम परवीन यांनी सुरुवातीलाच चोखंदळ रसिक अशी ओळख असलेल्या नागपूरकर रसिकांच्या प्रेमाचे आभार मानत ‘राग मारुविहाग’ने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. बालवयापासून नाद व सुरांच्या उद्यानात बागडणाऱ्या परवीन सुलताना यांच्यात पतियाळा व किराणा घराण्याच्या संमिश्र स्वरांची रागिणी वाहते. तीनही सप्तकात सहज फिरणारा गाजदार स्वर, लहान-मोठ्या तानांची वर्तुळे व सरगमची उधळण त्यांनी रसिकांवर केली. विलंबित एकतालातील ‘कैसे विन साजन...’ व द्रुत तीन तालातील ‘गवन न किजो...’ या बंदिशीसह त्यांनी रागविस्तार केला. पुढे राग ‘मालुहामांड’मध्ये झपतालातील बंदिश व तीन तालातील तराणा अशांसह त्यांनी आपले गायन कळसाला पोहचविले. खास श्रोत्यांच्या आग्रहावर मिश्र तिलंग रागातील ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते...’ ही मराठीतील रचना त्यांनी सादर करून बहारदार समापन केले.त्यांना तबल्यावर मुकुंदराज देव, हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, तानपुऱ्यावर ऋतुजा व शीतल यांनी सुरेल साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर आणि रेणुका देशकर यांनी केले. ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते.गडकरी यांच्या संदेशाने हृदय समापनकालिदास महोत्सवाच्या समापनाच्या औपचारिक कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे एमडी अभिमन्यू काळे, आयकर सहआयुक्त मुरारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओद्वारे संदेश दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या सादरीकरणाने हा महोत्सव देशभर परिचित झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत