शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा संदेश : अप्रतिम सादरीकरणाने कालिदास महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संत्रानगरी ही सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवाने विदर्भाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत असून, पर्यटनाचे केंद्र म्हणून अधिक मजबुतीने स्थापित होत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. सुधाकर कोहळे यांनी सांगितले, कवी कालिदास यांनी संस्कृतमधून अनेक अविस्मरणीय रचनांचा वारसा आपल्यासाठी ठेवला आहे. महोत्सवातील नृत्य व गायनाचे सादरीकरण म्हणजे या महान रचनाकाराला अभिवादन होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नंदा जिचकार व निशा सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कालिदास यांच्या वेगवेगळ्या रचनांवर आधारित संकल्पनांवर दरवर्षी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. 

त्यानंतर लेडी झाकीर हुसेन म्हणून प्रसिद्ध जगविख्यात तबलावादक अनुराधा पाल यांच्या तालवाद्य वृंदाचे अप्रतिम सादरीकरण झाले. अंतिम टप्प्यात मलमली स्वरांच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वरांची जादू रसिकांना अनुभवायला मिळाली. श्रवणानंदाचा आविष्कार अनुभवताना पहिल्याच दिवशी नागपूरकर श्रोते न्हाऊन निघाले.

माडखोलकर यांचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’  महोत्सवाची सुरुवात करण्याचा मान नागपूरच्या भरतनाट्यम् नृत्यांगना व गुरू श्रीमती माडखोलकर यांना मिळाला. कालिदासांच्या सर्वश्रेष्ठ अशा ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या महाकाव्यावर आधारित दृकश्राव्य आनंददायी शास्त्रीय नृत्य त्यांनी अप्रतिमपणे सादर केले.  कण्व ऋषींची सौंदर्यवती कन्या शकुंतला व राजा दुष्यंत यांच्या प्रथम भेटीतून निर्माण झालेले प्रेम, त्यांची आसक्ती. शकुंतलेच्या या आसक्तीमुळे ओढवलेला ऋषीचा रोष व त्यांच्या शापामुळे दैववश झालेली दोघांची ताटातूट व शापमुक्तीनंतर शकुंतला व राजा दुष्यंत यांचे आनंददायी पुनर्मिलन अशा पार्श्वभूमीचे हे महाकाव्य. खरंतर ४०० श्लोकांचे हे महाकाव्य सादरीकरणास तीन तासांच्यावर वेळ लागतो. मात्र त्यास लहान करून श्रीमती यांच्या कसदार सादरीकरणाने ते अतिशय प्रभावी ठरले. भरतनाट्यम्मध्ये भावमुद्रा व त्यानुसार पडणाऱ्या पदलालित्याचा संगम महत्त्वाचा असतो. भावमुद्रांमधून महाकाव्याचे कथानक अधोरेखित करण्याचे कसब त्या नृत्यांगनावर असते. श्रीमती यांनी ते सुंदरपणे सादर केली. कथानकातील शृंगार रसाची उत्कटता, तारुण्य सुलभ प्रीती, भावनांचे चित्रण, धीरोदात्त शकुंतलेचा स्वाभिमान, कणखरता अशा गुणांना श्रीमती यांनी त्यांच्या मुद्रांमधून चित्रित केले. डौलदार पदन्यास व त्यांच्यातील कसदार अभिनय क्षमतेमुळे त्यांचे सादरीकरण लक्षणीय ठरले. त्यांच्यासोबत गायक शिवप्रसाद, मृदंगम्वर के.एम. व्यंकटेश्वरम, व्हायोलिनवर शिरीष भालेराव व तालवाद्यावर बकुळ शावदे यांनी साथसंगत केली.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर