शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा संदेश : अप्रतिम सादरीकरणाने कालिदास महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संत्रानगरी ही सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवाने विदर्भाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत असून, पर्यटनाचे केंद्र म्हणून अधिक मजबुतीने स्थापित होत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. सुधाकर कोहळे यांनी सांगितले, कवी कालिदास यांनी संस्कृतमधून अनेक अविस्मरणीय रचनांचा वारसा आपल्यासाठी ठेवला आहे. महोत्सवातील नृत्य व गायनाचे सादरीकरण म्हणजे या महान रचनाकाराला अभिवादन होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नंदा जिचकार व निशा सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कालिदास यांच्या वेगवेगळ्या रचनांवर आधारित संकल्पनांवर दरवर्षी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. 

त्यानंतर लेडी झाकीर हुसेन म्हणून प्रसिद्ध जगविख्यात तबलावादक अनुराधा पाल यांच्या तालवाद्य वृंदाचे अप्रतिम सादरीकरण झाले. अंतिम टप्प्यात मलमली स्वरांच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वरांची जादू रसिकांना अनुभवायला मिळाली. श्रवणानंदाचा आविष्कार अनुभवताना पहिल्याच दिवशी नागपूरकर श्रोते न्हाऊन निघाले.

माडखोलकर यांचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’  महोत्सवाची सुरुवात करण्याचा मान नागपूरच्या भरतनाट्यम् नृत्यांगना व गुरू श्रीमती माडखोलकर यांना मिळाला. कालिदासांच्या सर्वश्रेष्ठ अशा ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या महाकाव्यावर आधारित दृकश्राव्य आनंददायी शास्त्रीय नृत्य त्यांनी अप्रतिमपणे सादर केले.  कण्व ऋषींची सौंदर्यवती कन्या शकुंतला व राजा दुष्यंत यांच्या प्रथम भेटीतून निर्माण झालेले प्रेम, त्यांची आसक्ती. शकुंतलेच्या या आसक्तीमुळे ओढवलेला ऋषीचा रोष व त्यांच्या शापामुळे दैववश झालेली दोघांची ताटातूट व शापमुक्तीनंतर शकुंतला व राजा दुष्यंत यांचे आनंददायी पुनर्मिलन अशा पार्श्वभूमीचे हे महाकाव्य. खरंतर ४०० श्लोकांचे हे महाकाव्य सादरीकरणास तीन तासांच्यावर वेळ लागतो. मात्र त्यास लहान करून श्रीमती यांच्या कसदार सादरीकरणाने ते अतिशय प्रभावी ठरले. भरतनाट्यम्मध्ये भावमुद्रा व त्यानुसार पडणाऱ्या पदलालित्याचा संगम महत्त्वाचा असतो. भावमुद्रांमधून महाकाव्याचे कथानक अधोरेखित करण्याचे कसब त्या नृत्यांगनावर असते. श्रीमती यांनी ते सुंदरपणे सादर केली. कथानकातील शृंगार रसाची उत्कटता, तारुण्य सुलभ प्रीती, भावनांचे चित्रण, धीरोदात्त शकुंतलेचा स्वाभिमान, कणखरता अशा गुणांना श्रीमती यांनी त्यांच्या मुद्रांमधून चित्रित केले. डौलदार पदन्यास व त्यांच्यातील कसदार अभिनय क्षमतेमुळे त्यांचे सादरीकरण लक्षणीय ठरले. त्यांच्यासोबत गायक शिवप्रसाद, मृदंगम्वर के.एम. व्यंकटेश्वरम, व्हायोलिनवर शिरीष भालेराव व तालवाद्यावर बकुळ शावदे यांनी साथसंगत केली.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर