शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच राजकीय पक्षांकडून नियोजनाचे नवीन गणित आखणे सुरू झाले. काही पक्षांचे निवडणूक सूत्रच बिघडले असले तरी या तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने ही प्रभागरचना आपल्याच फायद्याची असल्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे काहीच फरक पडत नसल्याचे म्हणत चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागामुळे परत सत्तेवर येऊ असाच दावा केला आहे. शहरात अस्तित्वासाठी अद्यापही संघर्ष करणाऱ्या मनसेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्रिसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवकांच्या दारात पायपीट करावी लागणार असल्याने जनतेचे नुकसान होणार असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे.

तीन सदस्यीय रचनेचा काँग्रेसला फायदाच

२००२ साली मी महापौर झालो असताना शहरात तीन सदस्यीय प्रभाग रचनाच होती. काँग्रेसला सत्तेवर येऊ द्यायचे नाही यासाठी भाजपने प्रभागाचे तुकडे करत चार सदस्यीय रचना आणली होती. नवीन प्रभाग रचनेचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. १५ वर्षांतील धूळफेक जनतेच्या लक्षात आली असून मतदार जागरुक झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत काँग्रेसचेच पारडे जड असेल.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

वॉर्डाच्या संख्येने फरक नाही

ज्यांना निवडणुकीत पडण्याची भीती वाटते त्यांनी १, २, ३ किंवा ४ प्रभाग तयार करावेत. भाजपला कशाचाही फरक पडत नाही. आमच्याकडे व्हिजनरी नेत्यांसोबतच लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे. महाविकास आघाडीतील पक्ष संकुचित मानसिकतेचे असून लोकांना संभ्रमित करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्याची चाल खेळली जात आहे.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादीला फायदा मिळणार

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक करण्याचा निर्णय जनहित लक्षात ठेवून घेतला आहे. राष्ट्रवादीने मनपा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे. या निर्णयामुळे पक्षाला फायदाच होणार आहे. आम्ही काँग्रेस व सेनेसह मिळून निवडणूक लढू इच्छितो. जर नागपुरात महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर निवडणुकीसाठी देखील पक्ष तयार आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

शिवसेनेसाठी चांगली संधी

मनपा निवडणुकीसाठी शिवसेना यंदा नव्या उर्जेने उतरणार आहे. शहरात तीन सदस्यीय प्रभागरचना असल्याने शिवसेनेसाठी चांगली संधी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी भाजप नगरसेवकांनी कामच केलेले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता खूष आहे. शिवाय शहरात संघटन बळकटीवर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे यावेळी चित्र बदललेले दिसेल.

- नितीन तिवारी, शहरप्रमुख, शिवसेना

निर्णय चुकीचा, आमच्या नियोजनाला धक्का नाही

मुळात राज्य शासनाने परत बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा निर्णय घेऊन घोडचूक केली आहे. यामुळे प्रभागांमध्ये समस्या वाढतात व जबाबदारी कुणा एका नगरसेवकावर निश्चित करता येत नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम करण्यात येते. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरू. या रचनेमुळे आमचे नुकसान होणार नाही हे निश्चित.

- हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस, मनसे