शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच राजकीय पक्षांकडून नियोजनाचे नवीन गणित आखणे सुरू झाले. काही पक्षांचे निवडणूक सूत्रच बिघडले असले तरी या तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने ही प्रभागरचना आपल्याच फायद्याची असल्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे काहीच फरक पडत नसल्याचे म्हणत चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागामुळे परत सत्तेवर येऊ असाच दावा केला आहे. शहरात अस्तित्वासाठी अद्यापही संघर्ष करणाऱ्या मनसेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्रिसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवकांच्या दारात पायपीट करावी लागणार असल्याने जनतेचे नुकसान होणार असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे.

तीन सदस्यीय रचनेचा काँग्रेसला फायदाच

२००२ साली मी महापौर झालो असताना शहरात तीन सदस्यीय प्रभाग रचनाच होती. काँग्रेसला सत्तेवर येऊ द्यायचे नाही यासाठी भाजपने प्रभागाचे तुकडे करत चार सदस्यीय रचना आणली होती. नवीन प्रभाग रचनेचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. १५ वर्षांतील धूळफेक जनतेच्या लक्षात आली असून मतदार जागरुक झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत काँग्रेसचेच पारडे जड असेल.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

वॉर्डाच्या संख्येने फरक नाही

ज्यांना निवडणुकीत पडण्याची भीती वाटते त्यांनी १, २, ३ किंवा ४ प्रभाग तयार करावेत. भाजपला कशाचाही फरक पडत नाही. आमच्याकडे व्हिजनरी नेत्यांसोबतच लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे. महाविकास आघाडीतील पक्ष संकुचित मानसिकतेचे असून लोकांना संभ्रमित करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्याची चाल खेळली जात आहे.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादीला फायदा मिळणार

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक करण्याचा निर्णय जनहित लक्षात ठेवून घेतला आहे. राष्ट्रवादीने मनपा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे. या निर्णयामुळे पक्षाला फायदाच होणार आहे. आम्ही काँग्रेस व सेनेसह मिळून निवडणूक लढू इच्छितो. जर नागपुरात महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर निवडणुकीसाठी देखील पक्ष तयार आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

शिवसेनेसाठी चांगली संधी

मनपा निवडणुकीसाठी शिवसेना यंदा नव्या उर्जेने उतरणार आहे. शहरात तीन सदस्यीय प्रभागरचना असल्याने शिवसेनेसाठी चांगली संधी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी भाजप नगरसेवकांनी कामच केलेले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता खूष आहे. शिवाय शहरात संघटन बळकटीवर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे यावेळी चित्र बदललेले दिसेल.

- नितीन तिवारी, शहरप्रमुख, शिवसेना

निर्णय चुकीचा, आमच्या नियोजनाला धक्का नाही

मुळात राज्य शासनाने परत बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा निर्णय घेऊन घोडचूक केली आहे. यामुळे प्रभागांमध्ये समस्या वाढतात व जबाबदारी कुणा एका नगरसेवकावर निश्चित करता येत नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम करण्यात येते. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरू. या रचनेमुळे आमचे नुकसान होणार नाही हे निश्चित.

- हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस, मनसे