शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी नागपुरातील भंतेंजींचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:26 IST

चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.

ठळक मुद्देदीक्षाभूमी ते धर्मशाळा : दोन हजार किमीच्या प्रवासात जनजागृती करणार

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.भंते रेवत दीक्षाभूमी असे या तरुण भंतेजींचे नाव. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथून त्यांनी आपल्या धम्म पदयात्रेला सुरुवात केली आहे. सध्या ते नागपुरात दाखल झाले आहेत. येथील दीक्षाभूमीला भेट दिली असून, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन ते पुढील प्रवासाला निघणार आहेत. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधता आला. तिबेट हा एक स्वतंत्र देश आहे. परंतु तो सध्या चीनच्या ताब्यात आहे. तिबेट हे पूर्णपणे बौद्ध राष्ट्र आहे. ६० वर्षांपूर्वी चीनने तिबेटवर अतिक्रमण करून ते राष्ट्र आपल्या ताब्यात घेतले. तिबेटी लोक दलाई लामा यांच्या नेतृत्वात आजही आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. भारतासह जगभरात तिबेटी लोक निर्वासितांचे जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत भारताने तिबेटला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली असती तर आज चीनसोबतचा सीमेचा वाद राहिलाच नसल्याचे तेव्हाच स्पष्ट केले होते. तिबेट हे एक बौद्ध राष्ट्र आहे. तथागत गौतम बुद्धांना ते मानतात. त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात एक नितांत आदर आहे. तसेच भारतानेही पारतंत्र्य भोगले आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्र याचे महत्त्व एक भारतीय या नात्याने आपल्यालाही आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता तिबेट स्वतंत्र व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे भंते रेवत यांचे म्हणणे आहे. दीक्षाभूमीवरून धर्मशाळापर्यंत ते पायी चालत जात आहेत.यादरम्यान ते विविध ठिकाणी चर्चासत्र, व्याख्यान आदींद्वारे तिबेटची मुक्ती भारतासाठी कशी आवश्यक आहे, हे पटवून देत असून जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या लढ्यात त्यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, इंडो तिबेट संघटना, पंचशील बुद्धगया मुक्ती आंदोलन, अखिल भरतीय भिक्खू संघ, महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्यासह देशातील विविध संघटनांचे सहकार्य मिळत आहे.स्वतंत्र तिबेट हे भारताच्या हिताचेचीनचे सामर्थ्य व त्याचे साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता, आज आपल्याला पाकिस्तानपेक्षा चीनचा अधिक धोका आहे. सीमारेषेवरून नेहमीच वाद होत असतात. दोन्ही देशांचे संबंध बिघडत असतात. अशा परिस्थितीत तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र असणे हे भारताच्या हिताचे आहे. तिबेट हे स्वतंत्र झाले तर चीनसोबतचा सीमावाद हा कायमचा संपेल. तिबेटसारखे एक शांत शेजारी राष्ट्र भारताला लाभल्याने त्या सीमेवरील तणाव कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे ह विषय केवळ तिबेटच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून तो भारताच्या कायमस्वरूपी संरक्षणाच्या हिताचाही आहे. याबाबतची आपण जनजागृती करीत आहोत.भंते रेवत दीक्षाभूमी

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर