शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी नागपुरातील भंतेंजींचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:26 IST

चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.

ठळक मुद्देदीक्षाभूमी ते धर्मशाळा : दोन हजार किमीच्या प्रवासात जनजागृती करणार

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.भंते रेवत दीक्षाभूमी असे या तरुण भंतेजींचे नाव. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथून त्यांनी आपल्या धम्म पदयात्रेला सुरुवात केली आहे. सध्या ते नागपुरात दाखल झाले आहेत. येथील दीक्षाभूमीला भेट दिली असून, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन ते पुढील प्रवासाला निघणार आहेत. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधता आला. तिबेट हा एक स्वतंत्र देश आहे. परंतु तो सध्या चीनच्या ताब्यात आहे. तिबेट हे पूर्णपणे बौद्ध राष्ट्र आहे. ६० वर्षांपूर्वी चीनने तिबेटवर अतिक्रमण करून ते राष्ट्र आपल्या ताब्यात घेतले. तिबेटी लोक दलाई लामा यांच्या नेतृत्वात आजही आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. भारतासह जगभरात तिबेटी लोक निर्वासितांचे जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत भारताने तिबेटला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली असती तर आज चीनसोबतचा सीमेचा वाद राहिलाच नसल्याचे तेव्हाच स्पष्ट केले होते. तिबेट हे एक बौद्ध राष्ट्र आहे. तथागत गौतम बुद्धांना ते मानतात. त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात एक नितांत आदर आहे. तसेच भारतानेही पारतंत्र्य भोगले आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्र याचे महत्त्व एक भारतीय या नात्याने आपल्यालाही आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता तिबेट स्वतंत्र व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे भंते रेवत यांचे म्हणणे आहे. दीक्षाभूमीवरून धर्मशाळापर्यंत ते पायी चालत जात आहेत.यादरम्यान ते विविध ठिकाणी चर्चासत्र, व्याख्यान आदींद्वारे तिबेटची मुक्ती भारतासाठी कशी आवश्यक आहे, हे पटवून देत असून जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या लढ्यात त्यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, इंडो तिबेट संघटना, पंचशील बुद्धगया मुक्ती आंदोलन, अखिल भरतीय भिक्खू संघ, महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्यासह देशातील विविध संघटनांचे सहकार्य मिळत आहे.स्वतंत्र तिबेट हे भारताच्या हिताचेचीनचे सामर्थ्य व त्याचे साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता, आज आपल्याला पाकिस्तानपेक्षा चीनचा अधिक धोका आहे. सीमारेषेवरून नेहमीच वाद होत असतात. दोन्ही देशांचे संबंध बिघडत असतात. अशा परिस्थितीत तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र असणे हे भारताच्या हिताचे आहे. तिबेट हे स्वतंत्र झाले तर चीनसोबतचा सीमावाद हा कायमचा संपेल. तिबेटसारखे एक शांत शेजारी राष्ट्र भारताला लाभल्याने त्या सीमेवरील तणाव कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे ह विषय केवळ तिबेटच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून तो भारताच्या कायमस्वरूपी संरक्षणाच्या हिताचाही आहे. याबाबतची आपण जनजागृती करीत आहोत.भंते रेवत दीक्षाभूमी

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर