शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बंदोबस्तात एवढे मनुष्यबळ नेहमीसाठी गुंतविणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:52 IST

दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देजनता सहकार्य करेल अशी अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जनता कर्फ्यू’दरम्यान दाखविलेले गांभीर्य नागरिकांकडून कायम राहिले तर निश्चितच ‘कोरोना’वर मात होऊ शकेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांची धरपकड आणि गुन्हे होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

‘जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. रस्त्यावर नागरिकांची गर्दी होईल, त्यांना आवरावे लागेल, अशी कुठेही स्थिती निर्माण झाली नाही. पोलिसांनी या दोन दिवसात १४ - १४ तास कर्तव्य सांभाळले. शहरात १५० फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. रस्तेच नव्हेतर गल्लीबोळातही पोलिसांची १७५ वाहने फिरत होती. पोलीस कर्मचारी आणि ठाणेदारच नव्हे तर स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारीही या दोन दिवसात रात्रंदिवस रस्त्यावर होते. मी स्वत: शहरातील सर्वच भागात फिरलो. नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले. नागरिकांचा हा समंजसपणा नागपुरातील कोरोनाचा संसर्ग कमी करेल, असा विश्वास या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे निर्माण झाला आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले.आवश्यक तेथे नाकेबंदी, फिक्स पॉईंटयापुढेही शहरातील विविध भागात आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी आणि फिक्स पॉईंट नियमित राहील, असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस