शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणे हे काँग्रेसचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतल्यानंतर ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम आणि पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्क्यावर जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अत्यल्प आणेवारी दाखवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पूर परिस्थिती, बोंडअळी, कीड यासारख्या अनेक अडचणी असतानाही शेतकऱ्यांना कसलीही मदत न देता केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करावे, हे आश्चर्यकारक आहे. पश्चिम विदर्भातील शेतीच्या नुकसानीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर कसलीही मदतीची घोषणा झाली नाही. मदतीसाठी पात्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांना अपात्र ठरवून डावलले. त्यामुळे विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. राज्य सरकारने कोणतेही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले नाही, त्यासाठी निधीही दिला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था माध्यमांनी मांडली आहे. तरीही मुख्यमंत्री, कृषिमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांना भेटून या विषयावर चर्चा करावी लागली. राज्यपालांशी झालेल्या आपल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. याकडे लक्ष घालावे अशी विनंती आपण निवेदनातून केल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी राजभवनवर राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, ललित संदूरकर, संदीप सरोदे, कपिल आदमने आदी उपिस्थत होते.