शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजिंगवरचा '100% शुद्ध' दावा खरंच खरा आहे का? हे पण ग्राहक बघणार तर FSSAI काय करतंय?

By शुभांगी काळमेघ | Updated: May 12, 2025 15:15 IST

खोट्या जाहिराती, फसवे दावे : ग्राहकांनी तक्रार करावी आणि FSSAI ने केवळ दंड उकळावा का?

शुभांगी काळमेघ नागपूर : सध्या बाजारात नकली पनीर विक्रीचं प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढले आहे. अनेक ठिकाणी भेसळयुक्त, कृत्रिमरित्या बनवलेलं पनीर विकल्या जाते. ते पनीर अगदी मूळ पनीरसारखं दिसतं, पण त्याचा स्वाद, पोषणमूल्य आणि आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर असतो. नकली पनीर स्टार्च, सिंथेटिक दूध, रसायने आणि घातक फॅट्सचा वापर करून तयार केलं जातं आणि बाजारात विकल्या सुद्धा जात. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन अक्षम आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ, दिशाभूल करणारे दावे, आणि बनावट उत्पादनांविरोधात FSSAI थेट कारवाई करू शकते. पण FSSAI आता ग्राहकांना ऑनलाईन तक्रार करण्यासाठी ‘Food Safety Connect’ हे अँप देत आहे ज्याद्वारे ग्राहक खोट्या उत्पादनांची तक्रार देऊ शकतात. FSSAI ची कामे ग्राहकांनी करावी तर मग प्रश्न उभा राहतो FSSAI काय करणार? 

ग्राहकाला हे कसं कळणार की उत्पादनात खरोखरच सांगितलेले घटक आहेत की नाहीत? एखादा ग्राहक दुकानात उभा असताना तो तर त्याला दिलेली माहिती खरी आहे असंच गृहीत धरणार कारण FSSAI चं पॅकेजिंगवर असलेलं प्रमाणपत्र त्याला ती हमी देईल. 

FSSAI चे काम आहे अन्नपदार्थांचे बाजारात पाठ्वण्याआधी स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये परीक्षण करणे, उत्पादन प्रक्रियांचे निरीक्षण करणे, आणि खोट्या दाव्यांना बाजारातच थांबवणे. पण त्याऐवजी ते ग्राहकांना बाजारात आलेले पदार्थ थांबवण्यासाठी तक्रारीचा पर्याय देतात. म्हणजे ते केवळ ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाई करणार. 

ग्राहकांच्या तक्रारीनंतर, संबंधित अन्न उत्पादकावर कारवाई करण्यासाठी FSSAI त्यांना नोटीस पाठवते. जर त्यांनी केलेल्या दाव्याचे योग्य पुरावे ते देऊ शकले नाहीत, तर त्यांच्यावर दंड, परवाना रद्द, किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

FSSAI ची जबाबदारी फक्त नियम बनवणे आणि तक्रारींची वाट बघणे नाही. तर त्यांना अधिक सक्रिय पद्धतीने उत्पादन तपासणी करणे, प्रयोगशाळा चाचण्या करणे, आणि बाजारातील सर्व अन्नपदार्थांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण ग्राहकाने उत्पादन विकत घेतल्यावर ते खोटं ठरल्यास तक्रार करूनही त्यांचे नुकसान व्हायचे ते तर झालेलं असेल, आर्थिक आणि शारीरिक दोन्ही.  

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधा