शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 17:39 IST

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे आयोजन

नागपूर : एखाद्या डिग्रीप्राप्त डॉक्टरने रुग्णावर उपचार करताना जर चुकीची औषधे दिली तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण शरीरावर होतात. तसच पत्रकारितेचं आहे. पत्रकाराने दिलेल्या एक चुकीच्या बातमीचा समाजावरदेखील विपरित परिणाम होतो. त्यामुळे पत्रकारिता व पत्रकार हे दोन्ही सामाजिक सखोलतेच भान ठेवून करणं अतिमहत्वाचं असल्याचे मत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपण स्थित्यंतराकडून चाललो आहे, विकसनशील देशातून विकसीत देशाकडे जाण्याची वाटचालीत मीडियाची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असायला हवी, असं मुनगंटीवार म्हणाले.

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे नागपुरात आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी असून चर्चा सत्राद्वारे या विषयावर मंथन होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. केंद्रातील भाजप सरकार, सरकारी तपास यंत्रणाची परिस्थिती व सद्यस्थितीत  मीडियावर उठत असलेल्या प्रश्नांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झाले का या विषयावर बोलताना त्यांनी  'नाही! या देशात मीडियाचं ध्रुवीकरण होऊ शकत नाही व होणारही नाही असे मत व्यक्त केले. ध्रुवीकरण म्हणजे आपल्या विचारांची बाब आहे. पत्रकारिता करताना दुषित दृष्टीचे परिणाम आपल्याला सत्याची बाजू मांडायला अडसर ठरते. पत्रकारिता करताना पत्राकाराची संबंधित विषयाबाबतची दृष्टी महत्वाची असून ती राष्ट्राच्या हिताची असावी मत त्यांनी व्यक्त केलं. 

'या' विषयांना तितकं महत्व का नाही?

मीडियात नेहमी राजकारणचं केंद्रस्थानी असतं, त्या चौकटीतून पाहिल्या मीडियाच्या ध्रुवीकरणावर प्रश्न उपस्थित होत होतो. पण त्यासोबत शिक्षा, स्वास्थ, पर्यावरण आदि विषयही तितकेच महत्वाचे आहेत. त्याबाबत आपली काही जबाबदारी नाही का, त्याकडे तितकेच लक्ष का दिले जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण लिहीत असलेल्या बातमीत भाव, आधार, तर्कवितर्क असायला हवे. आपण जे करतो ते राष्ट्राच्या हिताचं असायला हवं. आपल्याकडे बोलायला तोंड, पाहायला डोळे, ऐकायला कान आहेत पण दिसत असूनही तोंड बंद ठेवणं ही किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं ही चुकीची बाब आहेच परंतु, मीडिया बातमी देताना कशा व कोणत्या अँगलने देतो हे ही बघणं तितकचं महत्वाचं आहे असं म्हणत त्यांनी मीडियाचं ध्रुवीकरण होत आहे की नाही या प्रश्नावर प्रतिप्रश्न उपस्थित केला.

''मोदी काही पत्रकारांच्या मनात आहेत तर  काहींच्या डोक्यात''

आम्ही आमचे पोशाख बदलली असतील आधुनिक पेहराव घातले असतील पण आपल्या संस्कृतीचं भान आजही आमच्या मनात तसंच ठासून भरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मीडिया ध्रुवीकरण म्हणजे काय? पत्रकारिता करताना सामाजिक सखोलतेचं भान ठेवत माहितीचं आदानप्रदान करणं महत्वाचं असतं. वर्तमान पत्रकारितेच्या बातम्या टाकताना पत्रकार कुठल्या अँगलने ती पाहतो व कशी प्रस्तुत करतो हे महत्वाचं असतं, पण त्यात ध्रुवीकरण कुठे आलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी पंतप्रधान मोदी हे काही पत्रकारांच्या मनात आहेत तर  काहींच्या डोक्यात, असे उदाहरण दिले. 

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट