शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

सिंचन घोटाळा : नागपूर परिक्षेत्रामध्ये २० एफआयआर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:07 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारामध्ये आवश्यक चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी पाच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आठ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सात प्रकरणांमध्ये एसआयटीचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्देविदर्भातील सिंचन घोटाळा : हायकोर्टात एसीबीचे प्रतिज्ञापत्र

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारामध्ये आवश्यक चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी पाच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आठ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सात प्रकरणांमध्ये एसआयटीचा तपास सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रातील पुढील माहितीनुसार, १९ जुलै २०१८ नंतर तीन प्रकरणांत दोषारोपपत्रे दाखल करण्यात आलीत. त्यात गोसेखुर्द उजव्या कालव्याचे आरडी ९१ ते ९९ किमीपर्यंतचे मातीकाम व इतर कामात झालेला गैरव्यवहार, मोखाबर्डी सिंचन योजनेंतर्गत येणाºया नक्षी शाखा कालवा व चार वितरिकेच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि घोडाझरी शाखा कालव्याचे मातीकाम व इतर कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे वगळता अन्य २० प्रकरणांपैकी एका प्रकरणामध्ये नागपूर एसआयटीला दखलपात्र गुन्हा आढळून आला नाही. त्यामुळे एसीबी मुख्यालयाने प्रकरण बंद करण्याची परवानगी दिली आहे. सात प्रकरणामधील चौकशी अंतिम टप्प्यात आहे तर, १२ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत.विदर्भातील सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती सांगाविदर्भातील किती सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, किती सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल इत्यादी मुद्यांवर दोन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांच्या जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. विदर्भातील बºयाच सिंचन प्रकल्पांचे काम रखडले असून, त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब होत असल्यामुळे दरवर्षी बांधकाम खर्च वाढत आहे. शेतकºयांपर्यंत सिंचनाचे लाभ पोहोचविण्यासाठी हे प्रकल्प घोषित करण्यात आले होते. परंतु, लाखो शेतकरी आजही सिंचनाची प्रतीक्षा करीत आहेत. प्रकल्पांचे मूळ उद्देश पूर्ण झाले नाहीत, असे याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सरकारला हा आदेश दिला.रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, सिंचन घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे जनमंचचे म्हणणे आहे. जगताप यांनी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला वाटप झालेल्या चार कंत्राटांवर आक्षेप घेतला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कंत्राटाचा समावेश आहे. त्यांच्या याचिकेत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अजित पवार व माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प