शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नदी खोलीकरणावरून पाटबंधारे विभाग, चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 31, 2023 17:45 IST

हायकोर्टात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले

नागपूर :नदी खोलीकरण व रुंदीकरणच्या मुद्यावरून पाटबंधारे विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने आले आहेत. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. चंद्रपूर शहर हद्दीतील नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे तर, हा विषय पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने हाताळायला पाहिजे, असा दावा महानगरपालिकेने केला आहे.

चंद्रपूर येथील इरई व झरपट नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, सौंदर्यीकरण व इतर विविध विकासकामांसाठी माजी खासदार नरेश पुगलिया, नगरसेवक देवेंद्र बेले व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभाचे कोषाध्यक्ष रामदास वागदरकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात पाटबंधारे विभागाने २७ जुलै २०२३ तर, महानगरपालिकेने २८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. २५ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे बंधनकारक आहे, असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.

न्यायालयाने दोन्ही प्रमाणपत्रे रेकॉर्डवर घेतली आहेत. या प्रकरणावर ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. संबंधित नद्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीमधील रसायनेयुक्त पाणी, कचरा साठवणूक, चंद्रपूर वीज प्रकल्पातील फ्लाय ॲश इत्यादीमुळे प्रदूषित झाल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोठमोठी झाडे वाढली आहेत. संजयनगर, कृष्णानगर, इंदिरानगर, अंचलेश्वर वॉर्ड, पठाणपुरा इत्यादी वस्त्यांतील नागरिकांसाठी नदीपात्रे शौचालय झाले आहे. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संवर्धनासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक तर, पाटबंधारे विभागातर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालयriverनदीchandrapur-acचंद्रपूर