शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

नागपुरात आंतरराज्यीय शेट्टी गँगचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 20:33 IST

विविध राज्यात चोरी-घरफोडी करून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शेट्टी टोळीतील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात अजनी पोलिसांनी यश मिळवले. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. आठ जणांच्या या टोळीतील पाच जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देतिघांना पकडले, पाच फरारसात घरफोडींचा खुलासारोख आणि दागिने जप्त : अजनी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध राज्यात चोरी-घरफोडी करून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शेट्टी टोळीतील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात अजनी पोलिसांनी यश मिळवले. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. आठ जणांच्या या टोळीतील पाच जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.४ मेच्या पहाटे ३ च्या सुमारास अजनी पोलीस सुयोगनगरात गस्त करीत असताना चार संशयित व्यक्ती पोलिसांचे वाहन पाहून पळून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून चारपैकी तिघांना पकडले. प्रभू सुब्रम्हण्यम सनीपती (वय ३२, रा. सेवापेठ, जि. गुंटूर, तामिळनाडू ), व्यंकटेश वेल्यदेन कोरवन (वय ५४, रा. क्लोटमनपतूर, जि. वेल्लोर) आणि मुरली ऊर्फ रोशन परसरामन किल्लन (वय २६, रा. कल्लोट, जि. वेल्लोर, तामिळनाडू) अशी त्यांची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी काही दागिने आणि रोख तसेच पॅशन जप्त केली. हा मुद्देमाल अभयनगरातील हर्शल मांजरे यांच्या घरातून चोरला होता, अशी आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पीसीआर मिळवून चौकशी केली असता हे आरोपी त्यांच्या अन्य पाच साथीदारांसह मानेवाड्यातील महाकालीनगरात भाड्याच्या खोलीत राहत होते, असे स्पष्ट झाले.जानेवारी २०१८ पासून ३ मे पर्यंत त्यांनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरल्याचे सांगितले.त्यातील काही रक्कम, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान चीजवस्तू या आरोपींच्या साथीदारांनी आपापल्या गावाला रवाना केल्या. तर, अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी रोख, सोन्याचांदीचे दागिने तसेच हिरोहोंडा पॅशन एमएच ३१/ सीयू ११०१ तसेच अन्य काही चीजवस्तूंसह २ लाख, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.चंद्रपुरातही धुमाकूळया टोळीतील चोरट्यांनी गेल्या वर्षी चंद्रपुरातही धुमाकूळ घातला होता. तेथे १५ गुन्हे केल्यानंतर ही टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. हे सर्वच्या सर्व आरोपी तामिळनाडूतील असले तरी त्यांचा उपद्रव सर्वाधिक महाराष्ट्रात  आहे. टोळीचा म्होरक्या शेट्टी नामक आरोपी आहे. त्यामुळे या टोळीला शेट्टी गँग आणि अण्णा गँग म्हणून पोलीस ओळखतात. जानेवारी २०१८ मध्ये ही टोळी चंद्रपुरातील गुन्ह्यांच्या आरोपातून कारागृहातून बाहेर आली. त्यानंतर या टोळीने नागपुरात भाड्याचे घर घेऊन विविध भागात घरफोडीचे गुन्हे केले.चेन्नईला पळून जाणार होते४ मे च्या रात्री जास्तीत जास्त चोऱ्या-घरफोड्या करून ही टोळी ५ मे रोजी चेन्नईला पळून जाणार होती. त्यांनी ८ जणांचे रेल्वे तिकीट काढले होते. मात्र, एक दिवस अगोदरच पोलिसांनी या आठपैकी तिघांच्या मुसक्या बांधल्या. पाच जण मात्र पळून गेले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी बराचसा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागू शकतो. शहरातील विविध पोलीस ठाण्यातील मंडळी शेट्टी गँगला पकडण्यासाठी कामी लागली असताना परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये, द्वितीय निरीक्षक ए. पी. सिद यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एन. बी. गावंडे, पीएसआय बनसोडे, भुते, हवलदार रामचंद्र कारेमोरे, अनिल ब्राह्मणकर, सुरेश शेंडे, रतन बागडे, निलेश्वर तितरमारे, शैलेश प्रशांत आणि मनोज यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर