करिअर निवडताना आवड महत्त्वाची
By Admin | Updated: September 15, 2014 01:02 IST2014-09-15T01:02:27+5:302014-09-15T01:02:27+5:30
दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा.

करिअर निवडताना आवड महत्त्वाची
बारावी नंतर पुढे काय? : लोकमत युवा नेक्स्ट आणि नूतन भारत ज्युनियर कॉलेज यांचा कार्यक्रम
नागपूर : दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा. दहावी नंतर विषयाची निवड करताना कोणत्या विषयाचा फायदा पुढे होईल याची माहिती घेऊन त्याची निवड करा. करिअरबाबत जे ठरवले आहेत, त्यात यश संपादित करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची तयारी ठेवा, असा संवाद मानसशास्त्रज्ञ व मोटिव्हेशनल ट्रेनर, सोशल सायन्स व्हीएनआयटीचे विभाग प्रमुख डॉ. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला.
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचे वेध लागतात. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वजणच करिअर निवडीच्या चिंतेत असतात. अशा विद्यार्थ्यांना व पालकांना करिअर म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व भारतीय विद्या प्रसारक संस्था व नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी करिअर गायडन्स कार्यक्र मांतर्गत दहावी व बारावी नंतर पुढे काय, या विषयावर मार्गदर्शन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून प्रा. संजय कुळकर्णी (पुणे) तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण गडकरी, मनोज वाखरे, गाडे, प्रा. विजय दुबे, श्रीमती प्रधान व हारोडे भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, सचिव रमेश बक्षी, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे आदी उपस्थित होते. विद्यार्थी तसेच पालकांचा या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद लाभला. प्रा. देशपांडे यांनी करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीचा आवर्जून विचार करावा, कशाच्या आधारावर करिअर निवडावे आदींबाबत यावेळी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
या तीन गोष्टी महत्त्वाच्या
प्रा. संजय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांचे करिअर घडवताना अनेक पालकांना प्रश्न पडतो की, स्कोप कशात जास्त आहे. स्कोपवर करिअरची निवड करण्यापेक्षा या तीन गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मुलाची आवड, दुसरी त्याची क्षमता, तिसरी महत्त्वाची त्याची पात्रता याचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. अनेकजण उपलब्ध कोर्सपैकी सुरिक्षत करिअरची निवड करतात. करिअरच्या बाबतीत फार चोखंदळ बनू नका. आवडीचे करिअर तयार करण्यासाठी प्रयत्न करा. दुर्दैवाने आवडीचे करिअर मिळाले नाही तर निराश होऊ नका. करिअर म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग. त्यासाठी सर्वस्व पणाला लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.