शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बदली पाहिजे तर राजीनामा द्या अन दुसऱ्या जिल्ह्याची परीक्षा पास करा; जिप शिक्षकांमध्ये संतापाची लाट

By निशांत वानखेडे | Updated: June 26, 2023 15:50 IST

आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदल्या बंद

नागपूर : जिल्हापरिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच घेतला. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी परीक्षा द्यावी लागेल. शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रभर शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

२१ जून २०२३ रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने बदलीबाबतचे परिपत्रक काढले आहे. यानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी केवळ तक्रारी बदल्या, पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या व आपसी बदल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. शिक्षक सहकार संघटनेचे राज्यध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी शिक्षण विभागाचा हा तुघलकी निर्णय असल्याचा आरोप केला आहे.

पिट्टलवाड यांनी सांगितले, शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन केली होती. या क्रांतिकारी निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या तर सुरळीत झाल्या, शिवाय लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबला. त्यापूर्वी बदल्या करण्यासाठी शिक्षक लाखो रुपये खर्च करीत होते. मात्र हा चांगला निर्णय रद्द करून पुन्हा शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे कुरण तयार करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना नवा निर्णय लागू केल्याचा आरोप पिट्टलवाड यांनी लोकमतशी बोलताना केला.

निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम

या निर्णयाविरोधात शिक्षक सहकार संघटनेतर्फे डिजिटल स्वाक्षरी अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. संघटनेच्यावतीने रवी तिजारे, प्रमोद डोंगरे, रवी आंबुले, निलेश दशमुख, दिपक परचंडे, रवि अंबुले, रवि ढगे, गजानन देवकत्ते, अनिल बसुळे, मनोज बनकर, मनोज कोरडे आदींचा अभियानात सहभाग आहे.

तर शिक्षक स्वत:च तक्रारी करायला लावतील

नवीन धोरणात शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरण आणि तक्रारी बदल्यांना प्राधान्य देण्यात येईल. यामुळे शिक्षक स्वत:च ग्रामस्थांना तक्रारी करायला लावतील आणि अधिकाऱ्यांना पैसा देवून हव्या त्या जिल्ह्यात बदली करून घेतील, अशी शक्यता पिट्टलवाड यांनी व्यक्त केली. यामुळे भ्रष्टाचाराला पुन्हा खतपाणी घातले जाईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली