शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्ह्यातील सर्व गावांतील जलस्त्रोतांची होणार रासायनिक तपासणी

By गणेश हुड | Updated: June 15, 2023 14:02 IST

पाणी व स्वच्छता विभागाची ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम

 नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता आहे. यातून गावात साथरोगांचा   प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम ३० जूनपर्यंत राबविली जात आहे. तसेच जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपाणीसाठी माहितीसह प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

या तपासणीअंतर्गत नळयोजनेचे २२१८ स्त्रोत, २२११ शाळा व २१५२ अंगणवाड्यांमधील नमुने तसेच नळ पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील घरघुती स्तरावरील पहिल्या व शेवटच्या अश्या दोन ठिकाणी पाणी नमुने घेवून रासायनिक फिल्ड टेस्ट किट व्दारे व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमार्फत तपासणी  करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची सुरक्षीतता अबाधित राखण्यासाठी पाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे. 

पिण्याच्या पाण्याचे योग्य पध्दतीने शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठीच जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी केली जात आहे. पाणी गुणवत्तेच्या WQMlSया  पोर्टलवर पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटूंबे इ. स्त्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करुन पाणी गुणवत्ता पोर्टलवर युआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात येणार आहे. पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवताना कॕनवर पाणी नमुन्याचा पाणी गुणवत्ता पोर्टलवरील नोंदीचा संकेतांक असणे गरजेचा आहे.     

ग्रामपंचायतींनी अशी घ्यावी काळजी

पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये , यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करुन पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा. जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांजवळ  सांडपाण्याचा निचरा होऊ नये, याची काळजी घ्यावी. पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३३ टक्के क्लोरीन असलेल्या ब्लिचिंग पावडरचा साठा तीन महिने पुरेल एवढा उपलब्ध ठेवावा, घरघुती पाणी शुध्दीकरणाच्या पध्दती बाबत ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता  समिती तसेच ग्रामपंचायत कार्यकारणीने नागरीकांना माहिती द्यावी. असे  आवाहन जि.प.च्या  पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक संजय वानखेडे यांनी केले आहे.

टॅग्स :localलोकलWaterपाणीnagpurनागपूर