शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

लाेकमतच्या ‘रक्तदान महायज्ञात’ सखींचाही पुढाकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच ...

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच मंचच्या सदस्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नाेंदविला आहे. लाेकमततर्फे आयाेजित ‘रक्तदान महायज्ञ’ हेही सामाजिक जाणिवेचे राष्ट्रीय कार्य हाेय आणि या कार्यातही सखी मागे न राहता हिरीरीने सहभाग नाेंदवित आहेत. लाेकमत सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्याेत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त सखी मंचच्या हजारो सदस्यांनी रक्तदानाचा संकल्प केला आहे.

लाेकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जुलैपासून लोकमतच्यावतीने महाराष्ट्रभर ‘रक्तदान महायज्ञाचे’आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली. विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करील. आज पन्नास टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. शिवाय थॅलेसेमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर "लोकमत रक्ताचं नातं" या नावाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

कायम कुटुंब, चूल आणि मूल या चाैकटीत राहिलेल्या महिलांच्या सामाजिक जाणिवा अधिक व्यापक व्हाव्या, स्वत:साठी वेळ देऊन त्यांच्यातील स्वतंत्र विचारांना, सुप्त गुणांना नवे आयाम प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने ज्याेत्स्ना दर्डा यांनी २००० साली लाेकमत सखी मंचची स्थापना केली. हा सखींचा गाेतावळा वाढत राहिला आणि बघता बघता ताे महाराष्ट्र आणि गाेव्यात ४ लाखांच्या घरात पाेहचला.

सणवार असाे, व्रतवैकल्य असाे सखी मंचने विविध कार्यक्रमातून महिलांच्या भावनांना अर्थ दिला आणि त्यात तीही सुखावली. वेगवेगळे राेजगाराभिमूख वर्कशाॅप, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून सखींच्या आर्थिक सक्षमतेचा मार्गही सखी मंचने प्रशस्त केला. महिलांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतानाच त्यांच्या आराेग्यालाही केंद्रस्थानी ठेवले. त्यातून वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, जागृती, हेल्थ कॅम्पसह वेगवेगळ्या शिबिरांचे आयाेजन केले. देशविदेशातील सहलींचे आयाेजन करून त्यांच्या जीवनातील मळभ दूर केले. एवढेच नाही तर त्यांच्यात सामाजिक जाणिवेचीही रुजवात केली. ज्योत्स्ना दर्डा यांनी दिलेला वैचारिक वारसा सखी मंच तेवढ्याच ताकदीने पुढे चालवित आहे.