शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लाेकमतच्या ‘रक्तदान महायज्ञात’ सखींचाही पुढाकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच ...

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच मंचच्या सदस्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नाेंदविला आहे. लाेकमततर्फे आयाेजित ‘रक्तदान महायज्ञ’ हेही सामाजिक जाणिवेचे राष्ट्रीय कार्य हाेय आणि या कार्यातही सखी मागे न राहता हिरीरीने सहभाग नाेंदवित आहेत. लाेकमत सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्याेत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त सखी मंचच्या हजारो सदस्यांनी रक्तदानाचा संकल्प केला आहे.

लाेकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जुलैपासून लोकमतच्यावतीने महाराष्ट्रभर ‘रक्तदान महायज्ञाचे’आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली. विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करील. आज पन्नास टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. शिवाय थॅलेसेमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर "लोकमत रक्ताचं नातं" या नावाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

कायम कुटुंब, चूल आणि मूल या चाैकटीत राहिलेल्या महिलांच्या सामाजिक जाणिवा अधिक व्यापक व्हाव्या, स्वत:साठी वेळ देऊन त्यांच्यातील स्वतंत्र विचारांना, सुप्त गुणांना नवे आयाम प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने ज्याेत्स्ना दर्डा यांनी २००० साली लाेकमत सखी मंचची स्थापना केली. हा सखींचा गाेतावळा वाढत राहिला आणि बघता बघता ताे महाराष्ट्र आणि गाेव्यात ४ लाखांच्या घरात पाेहचला.

सणवार असाे, व्रतवैकल्य असाे सखी मंचने विविध कार्यक्रमातून महिलांच्या भावनांना अर्थ दिला आणि त्यात तीही सुखावली. वेगवेगळे राेजगाराभिमूख वर्कशाॅप, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून सखींच्या आर्थिक सक्षमतेचा मार्गही सखी मंचने प्रशस्त केला. महिलांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतानाच त्यांच्या आराेग्यालाही केंद्रस्थानी ठेवले. त्यातून वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, जागृती, हेल्थ कॅम्पसह वेगवेगळ्या शिबिरांचे आयाेजन केले. देशविदेशातील सहलींचे आयाेजन करून त्यांच्या जीवनातील मळभ दूर केले. एवढेच नाही तर त्यांच्यात सामाजिक जाणिवेचीही रुजवात केली. ज्योत्स्ना दर्डा यांनी दिलेला वैचारिक वारसा सखी मंच तेवढ्याच ताकदीने पुढे चालवित आहे.