शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

लाेकमतच्या ‘रक्तदान महायज्ञात’ सखींचाही पुढाकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच ...

नागपूर : गेल्या २० वर्षापासून महिलांचे अंतरंग फुलविणाऱ्या लाेकमत सखी मंचने सखींच्या सामाजिक जाणिवासुद्धा अधिक प्रगल्भ केल्या आहेत. म्हणूनच मंचच्या सदस्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नाेंदविला आहे. लाेकमततर्फे आयाेजित ‘रक्तदान महायज्ञ’ हेही सामाजिक जाणिवेचे राष्ट्रीय कार्य हाेय आणि या कार्यातही सखी मागे न राहता हिरीरीने सहभाग नाेंदवित आहेत. लाेकमत सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्याेत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त सखी मंचच्या हजारो सदस्यांनी रक्तदानाचा संकल्प केला आहे.

लाेकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जुलैपासून लोकमतच्यावतीने महाराष्ट्रभर ‘रक्तदान महायज्ञाचे’आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली. विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करील. आज पन्नास टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. शिवाय थॅलेसेमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर "लोकमत रक्ताचं नातं" या नावाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

कायम कुटुंब, चूल आणि मूल या चाैकटीत राहिलेल्या महिलांच्या सामाजिक जाणिवा अधिक व्यापक व्हाव्या, स्वत:साठी वेळ देऊन त्यांच्यातील स्वतंत्र विचारांना, सुप्त गुणांना नवे आयाम प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने ज्याेत्स्ना दर्डा यांनी २००० साली लाेकमत सखी मंचची स्थापना केली. हा सखींचा गाेतावळा वाढत राहिला आणि बघता बघता ताे महाराष्ट्र आणि गाेव्यात ४ लाखांच्या घरात पाेहचला.

सणवार असाे, व्रतवैकल्य असाे सखी मंचने विविध कार्यक्रमातून महिलांच्या भावनांना अर्थ दिला आणि त्यात तीही सुखावली. वेगवेगळे राेजगाराभिमूख वर्कशाॅप, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून सखींच्या आर्थिक सक्षमतेचा मार्गही सखी मंचने प्रशस्त केला. महिलांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतानाच त्यांच्या आराेग्यालाही केंद्रस्थानी ठेवले. त्यातून वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, जागृती, हेल्थ कॅम्पसह वेगवेगळ्या शिबिरांचे आयाेजन केले. देशविदेशातील सहलींचे आयाेजन करून त्यांच्या जीवनातील मळभ दूर केले. एवढेच नाही तर त्यांच्यात सामाजिक जाणिवेचीही रुजवात केली. ज्योत्स्ना दर्डा यांनी दिलेला वैचारिक वारसा सखी मंच तेवढ्याच ताकदीने पुढे चालवित आहे.