शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:10 IST

भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

ठळक मुद्देमीडिया महासंमेलनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या मीडिया विभागातर्फे ओमशांति मीडिया या पाक्षिकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य वक्ता म्हणून साधना पथ साप्ताहिकाचे माजी संपादक बी.के.अनुज, ओम शांती मीडियाचे चीफ एडिटर बीके.गंगाधर, धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एक आहे. विश्व हेच एक कुटुंब आहे, ही संकल्पना ब्रह्माकुमारीज् १९३६ पासून मांडत आहे. भारत अविनाशी खंड आहे. भारतीय संस्कृतीच्या आधारावरच हे म्हणण्यात येते की भारत होता, आहे आणि असेल. भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल स्वरूपाची राहिली आहे. वर्तमान स्थितीतील शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत. शरीर हेच मंदिर आहे हे कुणीच शिकवत नाही, असे बीके करुणाभाई म्हणाले.पत्रकारिता आणि आध्यात्मिकता वेगवेगळे राहू शकत नाही. आपल्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे. मात्र मनातील वृत्ती बदलणे आणि मनातील वैरभावनेला दूर करून शुद्ध करणे हे शक्य झालेले नाही. जर आपल्या मनात जगाच्या कल्याणाची भावना असेल तर लेखनीतदेखील तशीच शक्ती प्राप्त होईल, असे प्रतिपादन बी.के.गंगाधर यांनी केले. नवीन भारताच्या निर्माणात मीडियाचे मौलिक योगदान आहे. कायदे आपण बदलू शकत नाही, मात्र त्याला नैतिकतेमध्ये बदलू शकतो. केवळ परमात्माच आपल्याला सुरक्षा देऊ शकतो, असे मत अनुजभाई यांनी व्यक्त केले.नागपूर सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी रजनी दीदी व डॉ.बबन नाखले यांनीदेखील मत मांडले. बीके रक्षा दीदी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन बीके वर्षाबहन व बीके अनुजभाई यांनी केले. बीके मनीषा दीदी यांनी राजयोगाची अनुभूती सर्वांना करवून दिली. बीके प्रेमप्रकाश यांनी आभार मानले.

टॅग्स :IndiaभारतTeacherशिक्षकMediaमाध्यमे