शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

भारत धर्मशाळा नाही, कुणाचीही भूमी हडपायची नाही : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 11:20 IST

सामर्थ्यवानच शांतता व अहिंसा प्रस्थापित करू शकतात

नागपूर : केंद्र सरकारला देशाची सुरक्षा करायचीय. आम्हाला कुणाच्याही भूमीवर अतिक्रमण करायचे नाही. पण आपल्या लोकांचे रक्षण निश्चितच करायचे आहे. कुणीही यावे, दंगे करावे आणि निष्पाप लोकांना मारावे, असे चालणार नाही. भारत ही धर्मशाळा नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारत रक्षा मंचतर्फे रेशीमबाग येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हीच भारताची संस्कृती आहे. आपण कधीही भूतान व नेपाळच्या जमिनीवर डोळा ठेवला नाही. मात्र अंतर्गत सुरक्षेबाबत सजगता आवश्यक आहे. जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र सामर्थ्यवानाकडूनच शांतता व अहिंसा प्रस्थापित होऊ शकते, असे गडकरी म्हणाले. आमचे आयुर्वेद, योगविज्ञानाचा प्रचार जगभर झाला. मात्र आता लोक बदलले, देश बदलले, विज्ञान बदलले पण आपले धोरण व आदर्श बदललेले नाहीत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे नवीन पिढीसमोर कसे सादर करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

माझ्या फिटनेसचे अमिताभ, जया बच्चनकडून कौतुक

काही वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आता मी दररोज एक तास प्राणायाम करतो. याचा फायदा झाला आहे. मी मागील महिन्यात अमिताभ व जया बच्चन यांना भेटलो. तुमची तब्येत कशी सुधारली, अशी विचारणा करत तुम्ही आता १० ते १५ वर्षे तरुण दिसत असल्याचे कौतुकोद्गार बच्चन दाम्पत्याने काढल्याचे गडकरींनी सांगितले. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. आपण आपले ज्ञान चांगल्या तऱ्हेने सादरीकरण करायला शिकलो पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरी