शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारत धर्मशाळा नाही, कुणाचीही भूमी हडपायची नाही : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 11:20 IST

सामर्थ्यवानच शांतता व अहिंसा प्रस्थापित करू शकतात

नागपूर : केंद्र सरकारला देशाची सुरक्षा करायचीय. आम्हाला कुणाच्याही भूमीवर अतिक्रमण करायचे नाही. पण आपल्या लोकांचे रक्षण निश्चितच करायचे आहे. कुणीही यावे, दंगे करावे आणि निष्पाप लोकांना मारावे, असे चालणार नाही. भारत ही धर्मशाळा नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारत रक्षा मंचतर्फे रेशीमबाग येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हीच भारताची संस्कृती आहे. आपण कधीही भूतान व नेपाळच्या जमिनीवर डोळा ठेवला नाही. मात्र अंतर्गत सुरक्षेबाबत सजगता आवश्यक आहे. जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र सामर्थ्यवानाकडूनच शांतता व अहिंसा प्रस्थापित होऊ शकते, असे गडकरी म्हणाले. आमचे आयुर्वेद, योगविज्ञानाचा प्रचार जगभर झाला. मात्र आता लोक बदलले, देश बदलले, विज्ञान बदलले पण आपले धोरण व आदर्श बदललेले नाहीत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे नवीन पिढीसमोर कसे सादर करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

माझ्या फिटनेसचे अमिताभ, जया बच्चनकडून कौतुक

काही वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आता मी दररोज एक तास प्राणायाम करतो. याचा फायदा झाला आहे. मी मागील महिन्यात अमिताभ व जया बच्चन यांना भेटलो. तुमची तब्येत कशी सुधारली, अशी विचारणा करत तुम्ही आता १० ते १५ वर्षे तरुण दिसत असल्याचे कौतुकोद्गार बच्चन दाम्पत्याने काढल्याचे गडकरींनी सांगितले. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. आपण आपले ज्ञान चांगल्या तऱ्हेने सादरीकरण करायला शिकलो पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरी