शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारत धर्मशाळा नाही, कुणाचीही भूमी हडपायची नाही : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 11:20 IST

सामर्थ्यवानच शांतता व अहिंसा प्रस्थापित करू शकतात

नागपूर : केंद्र सरकारला देशाची सुरक्षा करायचीय. आम्हाला कुणाच्याही भूमीवर अतिक्रमण करायचे नाही. पण आपल्या लोकांचे रक्षण निश्चितच करायचे आहे. कुणीही यावे, दंगे करावे आणि निष्पाप लोकांना मारावे, असे चालणार नाही. भारत ही धर्मशाळा नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारत रक्षा मंचतर्फे रेशीमबाग येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ते शुक्रवारी बोलत होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हीच भारताची संस्कृती आहे. आपण कधीही भूतान व नेपाळच्या जमिनीवर डोळा ठेवला नाही. मात्र अंतर्गत सुरक्षेबाबत सजगता आवश्यक आहे. जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र सामर्थ्यवानाकडूनच शांतता व अहिंसा प्रस्थापित होऊ शकते, असे गडकरी म्हणाले. आमचे आयुर्वेद, योगविज्ञानाचा प्रचार जगभर झाला. मात्र आता लोक बदलले, देश बदलले, विज्ञान बदलले पण आपले धोरण व आदर्श बदललेले नाहीत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे नवीन पिढीसमोर कसे सादर करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

माझ्या फिटनेसचे अमिताभ, जया बच्चनकडून कौतुक

काही वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आता मी दररोज एक तास प्राणायाम करतो. याचा फायदा झाला आहे. मी मागील महिन्यात अमिताभ व जया बच्चन यांना भेटलो. तुमची तब्येत कशी सुधारली, अशी विचारणा करत तुम्ही आता १० ते १५ वर्षे तरुण दिसत असल्याचे कौतुकोद्गार बच्चन दाम्पत्याने काढल्याचे गडकरींनी सांगितले. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. आपण आपले ज्ञान चांगल्या तऱ्हेने सादरीकरण करायला शिकलो पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरी