शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास भारत समर्थ; राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका यांचे मत

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 28, 2025 23:41 IST

'जेन झी'ला योग्य दिशा दाखवणे आवश्यक

राकेश घानोडे, नागपूर: जगामध्ये आज भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे नवीन भारत अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यास आणि चीनसोबत स्पर्धा करण्यास समर्थ आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी यांनी व्यक्त केले.

समितीच्या नागपूर महानगर शाखेच्यावतीने रविवारी सायंकाळी रेशीमबागेतील स्मृती मंदिर येथे शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कमिटी ऑन पब्लिक ॲण्ड गव्हर्नमेंट फायनान्सियल मॅनेजमेंटच्या अध्यक्ष सीए केमिशा सोनी व समितीच्या प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समितीला 'वसुधैव कुटुंबकम' या सिद्धांतानुसार कार्य करायचे आहे. आज भारताची आध्यात्मिक जीवनदृष्टी संपूर्ण जगाला प्रभावित करीत आहे. भारत विविधतेने नटलेला देश आहे. असे असतानाही एकता अखंडित आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन नेहमीच शांततेत होते. महिलांना श्रेष्ठ संतान जन्माला घालण्याचे वरदान लाभले आहे. त्यांनी मातृत्वभाव कायम ठेवून सर्व क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. त्यातून त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील. महिलांनी या नवरात्रीपासून स्वदेशी वस्तू व विचार अंगीकारण्याचा संकल्प करावा, असेही व्ही. शांता कुमारी यांनी सांगितले. महानगर कार्यवाहिका करुणा साठे यांनी प्रास्ताविक तर, सोनाली गायकवाड यांनी संचालन केले.

'जेन झी'ला योग्य दिशा दाखवणे आवश्यक

नेपाळ व लडाखमध्ये 'जेन झी'ने केलेली हिंसक कृती अशोभनीय आहे. त्यांनी अशांती व्यक्त करण्यासाठी हिंसा करू नये. 'जेन झी'ला योग्य दिशा दाखवण्याचे कर्तव्य सर्व नागरिकांचे आहे. 'जेन झी'ला चारित्र्यसंपन्न योद्धे म्हणून तयार केल्यास सुदृढ समाजाचा पाया रचला जाईल. तसेच, त्यांच्या माध्यमातून देश विश्वगुरू बनू शकतो, याकडेदेखील व्ही. शांता कुमारी यांनी लक्ष वेधले.

देशाच्या शक्ती आहेत महिला - सीए केमिशा सोनी

भारतीय महिला शक्तीच्या रुप आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. देशाच्या विकासात त्यांचे योगदान मौल्यवान आहे. आता त्यांनी देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी कार्य करावे. सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. समितीने त्या योजना शेवटच्या महिलेपर्यंत घेऊन जाव्या. महिलांनी गुंतवणुकीमध्ये सहभागी व्हावे, असे सीए केमिशा सोनी यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका