शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:46 IST

अतिवादाचा विचार हा जगाचा स्वभाव आहे.म्हणून सृष्टीवर संकट ओढवले आहे. सृष्टी चालवण्यासाठी धर्म आवश्यक आहे.

ठळक मुद्देमोहन भागवत : हिंदू ही भारताची अभिन्न ओळख

नागपूर : अतिवादाचा विचार हा जगाचा स्वभाव आहे.म्हणून सृष्टीवर संकट ओढवले आहे. सृष्टी चालवण्यासाठी धर्म आवश्यक आहे. भारतवर्ष जगात केवळ धर्मासाठी जिवंत आहे. म्हणून भारतवर्षाचे अस्तित्व हे नित्य आहे. हिंदू ही भारताची अभिन्न ओळख असून भारतीयता, मानवता व बंधूभाव म्हणजेच हिंदू होय. तेव्हा भारतातील सर्व समाज एकरूप होऊन चालले तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केला.हिंदू धर्म संस्कृती मंदिर धंतोली यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप गुरुवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडला. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अरुण लखानी अध्यक्षस्थानी होते. हिंदू धर्म संस्कृती मंदिरचे अध्यक्ष बापू भागवत, उपाध्यक्ष वंदना लखानी महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर होते. यावेळी अमृत कुंभ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, धर्म व संस्कृती हा भारताचा शब्द आहे. भारतात जे विदेशी आले, त्यांनी या शब्दांचा योग्य अनुवाद केलेला नाही. ‘रिलिजन’ हा मूळ रिलीजिओ या लॅटीन शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ बांधून ठेवणे असा होता. धर्माचा हा अर्थ होऊ शकत नाही. सर्वांना जोडणारा, प्रारंभ, मध्य व शेवटही चांगला म्हणजे धर्म होय. भारतात प्राचीन काळापासून सदासर्वदा देश व समाजाच्या उत्थानासाठी धर्माचे आचरण हेच सांगितले गेले आहे. संविधानातही विविधतेतही एकता हीच सांगितली गेली आहे. जितकी मते आहेत तितके पथ आहेत. परंतु पथ वेगवेगळे असले तरी अनुभुती एक आहे. तेव्हा पंथ वेगवेगळे असू शकतात. परंतु त्यांचा उद्देश एकच असतो. विज्ञानही याच निष्ठेने बनलेले आहे आज आपण धर्म हा विज्ञाननिष्ठ आहे का, यावर चर्चा करतो. परंतु उद्या विज्ञान हे धर्माधिष्ठित आहे की नाही, यावर विचार करावा लागेल, त्याची सुरुवात झालेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अरुण लखानी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या वेगाने धावणाऱ्या तंत्र युगात भारतीय संस्कृती हीच मार्गदर्शक ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला.मंगेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ