शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

देशातील महिलांमधील साक्षरतेचा टक्का वाढीस; पदवीधरांची संख्या ३६ टक्क्यांहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 2:52 PM

देशातील साक्षरतेचा दर वाढविण्याचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून, महिलांचा शिक्षणाचा टक्कादेखील वाढीस लागला आहे.

ठळक मुद्देआदिवासी महिलांमधील निरक्षरतेचा टक्का चिंताजनक

योगेश पांडेनागपूर : देशातील साक्षरतेचा दर वाढविण्याचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून, महिलांचा शिक्षणाचा टक्कादेखील वाढीस लागला आहे. सद्यस्थितीत देशातील ७९ टक्क्यांहून अधिक महिला साक्षर झालेल्या आहेत. यातील ३६ टक्क्यांहून अधिक महिला या पदवीधारक आहेत. देशातील महिलांची सद्यस्थितीत या विषयावर पुण्यातील दृष्टी या स्वयंसेवी संस्थेतर्फे देशभरात विविध मुद्यांना घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील आकडेवारी ही महिलांच्या शिक्षणात बदल दाखविणारी आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार देशातील महिलांचा साक्षरता दर हा ६४.६ टक्के इतका होता. संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार आठ वर्षांत यात वाढ झाली आहे. साक्षर असलेल्यांपैकी ४६.०५ टक्के महिलांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे, तर १९.२३ टक्के महिला पदवीधारक व १४.२५ टक्के महिला या पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ०.०९ टक्के महिलांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे.सीमाक्षेत्रात साक्षरतेचे प्रमाण कमीदेशाच्या सीमाक्षेत्रातदेखील सर्वेक्षण करण्यात आले. यातील आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमधील २३.८६ टक्के महिला तर पश्चिम बंगालमधील १३.७३ टक्के महिलांनी कधीच शिक्षण घेतलेले नाही.अनुसूचित जातीतील ७० टक्के महिला साक्षर२०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीमधील महिलांची साक्षरतेची टक्केवारी ही ५६.५० टक्के इतकी होती, तर आदिवासी महिलांमधील टक्केवारी ही ४९.३५ टक्के इतकीच होती. देशभरात आदिवासी महिलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र त्यामुळे हवा तसा बदल झाला नसल्याचेदेखील सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांमधील निरक्षरतेची टक्केवारी ३६.५ टक्के, अनुसूचित जातीच्या महिलांची टक्केवारी ३०.३ टक्के इतकी तर विशेष मागास प्रवर्गातील निरक्षर महिलांची टक्केवारी २९.४ टक्के इतकी आहे.३० टक्के महिला शाळापातळीवरच सोडताहेत शिक्षणसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महिलांना शिक्षण घेण्यासाठी अजूनही बराच संघर्ष करावा लागत आहे. प्रामुख्याने कुटुंबातील आर्थिक समस्या व लग्नामुळे महिलांना शिक्षण सोडावे लागते. साक्षर असलेल्यांपैकी ४९.३२ टक्के महिलांनी पदवीच्या अगोदरच शिक्षण सोडले, तर ३०.७६ टक्के महिलांना शाळापातळीवरच शिक्षण सोडावे लागले.महिलांनीच केले महिलांसाठी सर्वेक्षणदृष्टी या संस्थेतर्फे देशभरातील २९ राज्य व ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७४ हजार ९५ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात महिलाच होत्या. देशभरात सुमारे सात हजार महिलांनीच हे सर्वेक्षण केले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र