शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तोतलाडोहच्या पातळीमध्ये १८ एमएमक्युबने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:09 IST

मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे.

ठळक मुद्देचौरईच्या सहापैकी दोन दरवाजे बंद : विसर्गाचा वेग निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे. सोमवारीदेखील चौरईमधून पाणी सोडणे सुरूच होते. मात्र त्याचा वेग आता निम्म्यावर आणला आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता चौरई धरणाच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले. सध्या ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याचा स्तर वाढला असता तरी एवढ्या लवकर पाणीकपातीमधून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तोतलाडोहचा जलस्तर १२३ वरून १८० दशलक्ष घनमीटर (एमएमक्युब) झाला आहे. तोतलाडोहचा जलस्तर रविवारच्या तुलनेत सोमवारी ५७ एमएमक्युबने वाढला आहे.मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलस्तर वाढला असता तरी नियमित पाणीपुरवठा करण्याएवढी स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे; नंतर जलस्तर वाढल्यावर त्यावर विचार केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातही पाणीकपात सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे.रविवारी पहाटे ४ वाजता चौरईचे सहा दार उघडण्यात आले होते. त्यातून ९८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी सकाळी ८ वाजता दोन दार बंद करण्यात आले होते.मनपा पाणीपुरवठा सभापती पिंटू झलके म्हणाले, चौरईतून पाणी सोडणे सुरूच आहे. येत्या २४ तासात तोतलाडोहचा जलस्तर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तोतलाडोहमध्ये समाधानकारक साठवणूक झालेली नाही. त्यामुळे पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता नाही. पुढील स्थितीवर हे अवलंबून असेल.तोतलाडोहमध्ये सोमवारी सकाळी ८.३० वाजता १८ टक्के पाण्याच्या पातळीची नोंद करण्यात आली. यात १८० एमएमक्युब पाणी आहे. मागील वर्षी या काळात २३.१४ टक्के पाणी होते. तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ एमएमक्युब आहे. सध्या येथे ३३०.०२ एमएमक्युब पाणी शिल्लक असून, वापरण्यालायक पाणी १८० एमएमक्युब आहे.नवेगावमध्ये किंचित वाढनवेगाव खैरी (पेंच) प्रकल्पात रविवारच्या तुलनेत सोमवारी ०.४१ टक्के वाढ झाली. मागील वर्षी या काळात येथे ३९.३१ टक्के पाणी होते. सध्या नवेगाव खैरी प्रकल्पात ७८.३१ एमएमक्युब पाण्याचा साठा आहे. त्यातील ३९.६१ एमएक्युब वापरायोग्य आहे. या जलाशयाची निर्धारण क्षमता १८० एमएमक्युब आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी