शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तोतलाडोहच्या पातळीमध्ये १८ एमएमक्युबने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:09 IST

मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे.

ठळक मुद्देचौरईच्या सहापैकी दोन दरवाजे बंद : विसर्गाचा वेग निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे. सोमवारीदेखील चौरईमधून पाणी सोडणे सुरूच होते. मात्र त्याचा वेग आता निम्म्यावर आणला आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता चौरई धरणाच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले. सध्या ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याचा स्तर वाढला असता तरी एवढ्या लवकर पाणीकपातीमधून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तोतलाडोहचा जलस्तर १२३ वरून १८० दशलक्ष घनमीटर (एमएमक्युब) झाला आहे. तोतलाडोहचा जलस्तर रविवारच्या तुलनेत सोमवारी ५७ एमएमक्युबने वाढला आहे.मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलस्तर वाढला असता तरी नियमित पाणीपुरवठा करण्याएवढी स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे; नंतर जलस्तर वाढल्यावर त्यावर विचार केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातही पाणीकपात सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे.रविवारी पहाटे ४ वाजता चौरईचे सहा दार उघडण्यात आले होते. त्यातून ९८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी सकाळी ८ वाजता दोन दार बंद करण्यात आले होते.मनपा पाणीपुरवठा सभापती पिंटू झलके म्हणाले, चौरईतून पाणी सोडणे सुरूच आहे. येत्या २४ तासात तोतलाडोहचा जलस्तर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तोतलाडोहमध्ये समाधानकारक साठवणूक झालेली नाही. त्यामुळे पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता नाही. पुढील स्थितीवर हे अवलंबून असेल.तोतलाडोहमध्ये सोमवारी सकाळी ८.३० वाजता १८ टक्के पाण्याच्या पातळीची नोंद करण्यात आली. यात १८० एमएमक्युब पाणी आहे. मागील वर्षी या काळात २३.१४ टक्के पाणी होते. तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ एमएमक्युब आहे. सध्या येथे ३३०.०२ एमएमक्युब पाणी शिल्लक असून, वापरण्यालायक पाणी १८० एमएमक्युब आहे.नवेगावमध्ये किंचित वाढनवेगाव खैरी (पेंच) प्रकल्पात रविवारच्या तुलनेत सोमवारी ०.४१ टक्के वाढ झाली. मागील वर्षी या काळात येथे ३९.३१ टक्के पाणी होते. सध्या नवेगाव खैरी प्रकल्पात ७८.३१ एमएमक्युब पाण्याचा साठा आहे. त्यातील ३९.६१ एमएक्युब वापरायोग्य आहे. या जलाशयाची निर्धारण क्षमता १८० एमएमक्युब आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी