शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

तोतलाडोहच्या पातळीमध्ये १८ एमएमक्युबने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:09 IST

मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे.

ठळक मुद्देचौरईच्या सहापैकी दोन दरवाजे बंद : विसर्गाचा वेग निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौरई धरणाच्या विसर्गामुळे तोतलाडोह जलाशयाचा साठा वाढला आहे. २६ तासांमध्ये ५.९१ टक्केयात वाढ झाली असून, आता तो १८ टक्यांवर पोहचला आहे. सोमवारीदेखील चौरईमधून पाणी सोडणे सुरूच होते. मात्र त्याचा वेग आता निम्म्यावर आणला आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता चौरई धरणाच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले. सध्या ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याचा स्तर वाढला असता तरी एवढ्या लवकर पाणीकपातीमधून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तोतलाडोहचा जलस्तर १२३ वरून १८० दशलक्ष घनमीटर (एमएमक्युब) झाला आहे. तोतलाडोहचा जलस्तर रविवारच्या तुलनेत सोमवारी ५७ एमएमक्युबने वाढला आहे.मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलस्तर वाढला असता तरी नियमित पाणीपुरवठा करण्याएवढी स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे; नंतर जलस्तर वाढल्यावर त्यावर विचार केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातही पाणीकपात सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे.रविवारी पहाटे ४ वाजता चौरईचे सहा दार उघडण्यात आले होते. त्यातून ९८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी सकाळी ८ वाजता दोन दार बंद करण्यात आले होते.मनपा पाणीपुरवठा सभापती पिंटू झलके म्हणाले, चौरईतून पाणी सोडणे सुरूच आहे. येत्या २४ तासात तोतलाडोहचा जलस्तर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तोतलाडोहमध्ये समाधानकारक साठवणूक झालेली नाही. त्यामुळे पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता नाही. पुढील स्थितीवर हे अवलंबून असेल.तोतलाडोहमध्ये सोमवारी सकाळी ८.३० वाजता १८ टक्के पाण्याच्या पातळीची नोंद करण्यात आली. यात १८० एमएमक्युब पाणी आहे. मागील वर्षी या काळात २३.१४ टक्के पाणी होते. तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ एमएमक्युब आहे. सध्या येथे ३३०.०२ एमएमक्युब पाणी शिल्लक असून, वापरण्यालायक पाणी १८० एमएमक्युब आहे.नवेगावमध्ये किंचित वाढनवेगाव खैरी (पेंच) प्रकल्पात रविवारच्या तुलनेत सोमवारी ०.४१ टक्के वाढ झाली. मागील वर्षी या काळात येथे ३९.३१ टक्के पाणी होते. सध्या नवेगाव खैरी प्रकल्पात ७८.३१ एमएमक्युब पाण्याचा साठा आहे. त्यातील ३९.६१ एमएक्युब वापरायोग्य आहे. या जलाशयाची निर्धारण क्षमता १८० एमएमक्युब आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी