शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर विभागातील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:02 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.

ठळक मुद्देअसोलामेंढा १०० टक्के भरले, धाम ९०.९७ टक्के : गोसेखुर्द ५३.८ टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पूर्व विदर्भात चांगला पाऊस होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. चंद्रपुरातील असोलामेंढा धरण १०० टक्के भरले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील धाम ९०.९७ टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात ८ आॅगस्टपर्यंत २२४४ दलघमी म्हणजे ६०.२३ टक्के इतके पाणी जमा झाले आहे. जिल्हानिहाय धरणातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा ७३.२७ टक्के, बोर ७१.७७ टक्के, पोथरा ३९.४३ टक्के भरले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक खिंडसी २५.२८ टक्के, नांद वणा ३३.५५ आणि वडगाव ६५.८९ टक्के भरले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.३९ टक्के, सिरपूर २४.९ टक्के, पुजारीटोला १५.२१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ हे २७.८८ टक्के भरले आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्प ३०.६३ टक्के भरले. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी ३४.६६ टक्के भरले आहे.

अनेक धरणाचे गेट उघडावे लागलेविभागातील अनेक धरणाचे दरवाजे उघडावे लागले. गोसेखुर्दचे ९ गेट उघडल्या गेले. धापेवाडा बॅरेजचे ५, लोअर वर्धाचे २ गेट उघडल्या गेले.

मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती उत्तमनागपूर विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४८ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २७५.२३ दलघमी म्हणजे ५१.३० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. लघु प्रकल्पही ५० टक्केवर भरली आहेत.

टॅग्स :Waterपाणी