शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:14 IST

दोन वर्षांपासून अनियमित व अपुऱ्या पावसामुळे सरासरी पडणाऱ्या पावसात मागील वर्षी २० टक्के तर यावर्षी १२.६३ टक्के घट झाली आहे. सरासरी पडणाऱ्या पावसाच्या भूजलातील स्थिर पाण्याच्या पातळीत जिल्ह्यातील कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भूजलातील पातळी वाढण्यासोबतच स्थिर राहण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देकामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांपासून अनियमित व अपुऱ्या पावसामुळे सरासरी पडणाऱ्या पावसात मागील वर्षी २० टक्के तर यावर्षी १२.६३ टक्के घट झाली आहे. सरासरी पडणाऱ्या पावसाच्या भूजलातील स्थिर पाण्याच्या पातळीत जिल्ह्यातील कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भूजलातील पातळी वाढण्यासोबतच स्थिर राहण्यास मदत झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील तीन वर्षांपासून सरासरी अपुऱ्या पडणाऱ्या पावसानंतरही भूजलाची पातळी कायम स्थिर राहणे शक्य झाले आहे. जलयुक्त शिवारच्या उपलब्ध पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात श्वाश्वत सिंचनाचा लाभ मिळत आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवारच्या कामामुळे जिल्ह्यात २५ हजार ४८५ टीएमसी एवढा पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला दोनवेळा सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतातील पिके वाचविण्यास मोठी मदत झाली आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरासरी सप्टेंबर २-१८ पर्यंतचे पर्जन्यमान व पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केले आहे. १११ निरीक्षण विहिरींच्या निश्चित केलेल्या पाण्याच्या स्थिर पातळीची नोंद करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ९८८.५४ मिलिमीटर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जून ते सप्टेंबर पर्यंत ८६८.७५ मिलिमीटर पाऊस पडला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत ११९.७९ मिलिमीटर कमी पाऊस म्हणजे १२.६३ टक्के घट झाली आहे. घट झालेल्या तालुक्यांमध्ये नागपूर ग्रामीण, हिंगणा, काटोल, नरखेड, कळमेश्वर, मौदा, पारशिवनी, उमरेड, कुही आणि भिवापूर या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२० गावात ३ हजार ५११ कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार ३२० कामे पूर्ण झाल्यामुळ पावसाचे पाणी अडवून जलयुक्तच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्वाश्वत सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे भूजलाची पातळी स्थिर राहू शकली. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरला आहे.भूजल सर्वेक्षण यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्त्वाच्या नोंदी समोर आल्यात. त्यामध्ये निरीक्षण विहिरीमधील सप्टेंबर २०१८ मधील सरासरी पाण्याची स्थिर पातळी मागील सात वर्षांच्या तुलनेत केवळ सरासरी ०.०६ ते १ मीटर पेक्षाही कमी आढळून आलेल्या तालुक्यामध्ये भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, कुही, नागपूर, नरखेड, रामटेक, उमरेड या तालुक्यांचा समावेश आहे. सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झालेल्या तालुक्यांमध्ये कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात वाढ आढळून आली आहे. भूजलाच्या सातत्याने व अतिवापरामुळे भूजल कमी आढळून आले असले तरी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जलयुक्त शिवारच्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होणे व सातत्याने कायम राहणे सहज शक्य झाले आहे.तालुक्यांमध्ये अशी झाली वाढपर्जन्यमान नंतरच्या सन २०१४ व २०१८ च्या पाणी पातळीचा निरीक्षण विहिरीनिहाय तुलनात्मक अभ्यासामध्ये २०१४ मध्ये ३.०४ पाणी पातळी होती तर २०१८ मधील पाणीपातळी ३.६० म्हणजेच ०.५६ टक्क्याने वाढ झाली आहे. भूजलाच्या सरासरी वाढ झालेल्या तालुक्यांमध्ये उमरेड, मौदा, भिवापूर, कुही, कामठी या तालुक्यात ०.२५ टक्के तर रामटेक, नरखेड, हिंगणा, नागपूर, काटोल, कळमेश्वर या तालुक्यात ०.६६ ते १.५६ टक्के वाढ दिसून आली. सावनेर व पारशिवनी या तालुक्या अल्पशी घट आढळून आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. श्रीमती वर्षा माने यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी