शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:45 IST

ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबदलत्या वातावरणाचा शरीरावर प्रभाव : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर गारठले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. हे वातावरण विशेषत: घसा आणि फुफ्फुसामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ज्येष्ठांमध्ये वात, कंबरदुखी, मणक्यांचे आजारही बळावले आहेत.थंडी सुखद वाटत असली तरी वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. अंगातील ऊर्जा कमी झाल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवते. सांधेदुखी, सर्दी, खोकला, दमा यासारखे विकार थंडीत हमखास डोके वर काढतात. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी हे दिवस कसोटीचे असतात. मात्र थोडीफार काळजी घेतल्यास यातील बऱ्याचशा त्रासापासून सुटका होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.नवजात बालकांना हायपोथर्मियाची भीती-डॉ. अग्रवालबालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, नवजात बालके थंड पडल्यास ‘हायपोथर्मिया’ आजार होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असते. नवजात बालकांना किमान ३४ ते ३५ अंश तापमानाची गरज असते. यामुळे अशा बालकांना आईने वरचेवर दूध पाजावे. कापडात गुंडाळून ठेवावे. या दिवसात बाळाला आवश्यक उष्णता मिळणे आवश्यक असते.सर्दी, व्हायरलच्या रुग्णांनापासून दूर रहा- डॉ. गावंडेबालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, बदललेल्या या हवामानामुळे सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, दम्याचे दिसून येत आहे. या शिवाय, नाक चोंदणे, सारख्या शिंका येणे, डोळे लाल होणे, ऐकायला थोडे कमी येणे, डोकेदुखी, ताप, थकवा, भूक मंदावणे ही ‘व्हायरल’ तापाची लक्षणे आहेत. सध्या या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. हा ताप संसर्गजन्य असल्यामुळे आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे किंवा कमी करावा. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.अस्थमाच्या रुग्णांत ५० टक्क्याने वाढ -डॉ. गिल्लुरकरफिजिशियन डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले थंडी, हवेतील प्रदूषण व धुरामुळे अस्थमा म्हणजेच दम्याच्या रुग्णांत गेल्या काही दिवसात ५० टक्क्याने वाढ झाली आहे. यात साधारण १२ ते १८ आणि त्याही पुढील वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री खोकला येणे, सामान्य औषधांनीही बरा न होणे, दम लागणे ही अस्थम्याची लक्षणे आहेत. अशा रुग्णांची चाचणी करून किती श्वास नळ्या ‘ब्लॉक’ आहेत त्या तपासल्या जातात आणि त्यानुसार औषधोपचार केले जातात. यात ‘इनहेलर’ ही सर्वात फायदेमंद औषध आहे. वरील लक्षणे दिसणाºया रुग्णांनी त्वरित उपचार घेणे आवश्यक असते. 

‘हार्ट अटॅक’चा धोका वाढतो-डॉ. देशमुखहृदयविकार तज्ज्ञ डॉ. पी.पी. देशमुख म्हणाले, अतिथंडीमुळे रक्तवाहिन्या, सांधे अखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा परिस्थितीत हृदयविकार असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटक) येण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा अंदाज नाही अशांसाठी हे धोकादायक ठरू शकते. म्हणून थंडीत हृदयाची काळजी घेणे आवश्यक असते.

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर