शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:45 IST

ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबदलत्या वातावरणाचा शरीरावर प्रभाव : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर गारठले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. हे वातावरण विशेषत: घसा आणि फुफ्फुसामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ज्येष्ठांमध्ये वात, कंबरदुखी, मणक्यांचे आजारही बळावले आहेत.थंडी सुखद वाटत असली तरी वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. अंगातील ऊर्जा कमी झाल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवते. सांधेदुखी, सर्दी, खोकला, दमा यासारखे विकार थंडीत हमखास डोके वर काढतात. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी हे दिवस कसोटीचे असतात. मात्र थोडीफार काळजी घेतल्यास यातील बऱ्याचशा त्रासापासून सुटका होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.नवजात बालकांना हायपोथर्मियाची भीती-डॉ. अग्रवालबालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, नवजात बालके थंड पडल्यास ‘हायपोथर्मिया’ आजार होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असते. नवजात बालकांना किमान ३४ ते ३५ अंश तापमानाची गरज असते. यामुळे अशा बालकांना आईने वरचेवर दूध पाजावे. कापडात गुंडाळून ठेवावे. या दिवसात बाळाला आवश्यक उष्णता मिळणे आवश्यक असते.सर्दी, व्हायरलच्या रुग्णांनापासून दूर रहा- डॉ. गावंडेबालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, बदललेल्या या हवामानामुळे सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, दम्याचे दिसून येत आहे. या शिवाय, नाक चोंदणे, सारख्या शिंका येणे, डोळे लाल होणे, ऐकायला थोडे कमी येणे, डोकेदुखी, ताप, थकवा, भूक मंदावणे ही ‘व्हायरल’ तापाची लक्षणे आहेत. सध्या या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. हा ताप संसर्गजन्य असल्यामुळे आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे किंवा कमी करावा. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.अस्थमाच्या रुग्णांत ५० टक्क्याने वाढ -डॉ. गिल्लुरकरफिजिशियन डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले थंडी, हवेतील प्रदूषण व धुरामुळे अस्थमा म्हणजेच दम्याच्या रुग्णांत गेल्या काही दिवसात ५० टक्क्याने वाढ झाली आहे. यात साधारण १२ ते १८ आणि त्याही पुढील वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री खोकला येणे, सामान्य औषधांनीही बरा न होणे, दम लागणे ही अस्थम्याची लक्षणे आहेत. अशा रुग्णांची चाचणी करून किती श्वास नळ्या ‘ब्लॉक’ आहेत त्या तपासल्या जातात आणि त्यानुसार औषधोपचार केले जातात. यात ‘इनहेलर’ ही सर्वात फायदेमंद औषध आहे. वरील लक्षणे दिसणाºया रुग्णांनी त्वरित उपचार घेणे आवश्यक असते. 

‘हार्ट अटॅक’चा धोका वाढतो-डॉ. देशमुखहृदयविकार तज्ज्ञ डॉ. पी.पी. देशमुख म्हणाले, अतिथंडीमुळे रक्तवाहिन्या, सांधे अखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा परिस्थितीत हृदयविकार असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटक) येण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा अंदाज नाही अशांसाठी हे धोकादायक ठरू शकते. म्हणून थंडीत हृदयाची काळजी घेणे आवश्यक असते.

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर