शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मृत्यू गाठला वेशीवर, धीर कोणा कोणा देऊ! सहा जणांच्या अंत्ययात्रेत सारा गणगोत गहिवरला

By जितेंद्र ढवळे | Updated: December 16, 2023 21:14 IST

सोनखांब अपघातातील मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार...

नागपूर (काटोल) : ‘होत्याचं नव्हतं झालं’ असे जे म्हणतात, अगदी तशाच घटनेचा सामना मेंढेपठार येथील गावकऱ्यांना करावा लागला आहे. गावातील मुलीला थाटामाटात विदाई दिल्यानंतर, तिच्या सासरी झालेल्या स्वागत समारंभाहून परतताना झालेल्या अपघातात गावातील सहा जणांना मृत्यूने गाठले. आनंदाचे रूपांतरण शोककळेत झाले. त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा कोणाकोणाचे सांत्वन करावे, असा अनुत्तरित प्रश्न गावकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांत आणि दु:खाने माखलेल्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अख्खा गणगोत व्यक्तही होऊ शकत नव्हता आणि स्वत:ला सांभाळूही शकत नव्हता.शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्री नागपूर येथे पार पडलेल्या स्वागत समारंभातून परतताना नागपूर-काटोल मार्गावरील सोनखांब शिवारात गावकऱ्यांनी भरलेली क्वॉलिस आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. यात क्वालिसमधील मेंढेपठार येथील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यात वाहन चालक मयूर मोरेश्वर इंगळे (२५), सुधाकर रामचंद्र मानकर (४०), विठ्ठल दिगंबर थोटे (४०), रमेश ओमकार हेलोंडे (५०), वैभव साहेबराव चिखले (३२), अजय दशरथ चिखले (४०) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच, शनिवारी सकाळपासूनच नातेवाईक आणि गावकऱ्यांची गर्दी मृतांच्या अंतिम दर्शनासाठी उसळली होती. गावावर ओढावलेल्या या शोककळेमुळे एकाही घरात चूल पेटली नाही. दुपारी २ वाजताच्या सुमारास सर्वांचे पार्थिव मेंढेपठारला आणण्यात आले. त्यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा आभाळ फाटावा, असाच होता. नातेवाईक ज्याचे, त्याचे होतेच, परंतु गावातील प्रत्येक नागरिकांसाठी सहाही चेहरे रोजचेच होते आणि ते पुन्हा कधीही दिसणार नव्हते. त्यामुळे ते भांबावलेले होते. याचे सांत्वन करू की त्याचे सांत्वन करू, अशा स्थितीत तो स्वत:लाही धीर कसा देऊ, अशा मानसिकतेत होता. सहाही पार्थिवांवर गावातील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा घराकडे परतणारी पावलेही गारठली होती.सहाही जण होते कुटुंबाचा आधार- वैभव साहेबराव चिखले : एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या वैभव यांना महिन्याभरापूर्वी मुलगी झाली होती. तिचे नामकरणही झाले होते. मात्र, जगण्याचे भान येण्यापूर्वीच ती वडिलांपासून पोरकी झाली. पत्नी बाळंतीण अवस्थेत असल्याने, तिच्या वेदना व्यक्त करणे अवघड आहे. आताच थाटलेला संसार जेमतेम फुलायला लागला होता आणि त्यातच काळाने घाला घातल्याने, ते नि:शब्द झाले आहे.- मयूर मोरेश्वर इंगळे : मयूर हा स्कूलबस चालवत होता. तो एकुलता एक मुलगा होता. घर सांभाळण्याची जबाबदारी त्याचीच होती. लग्नासाठी मुलगी बघणे सुरू होते. मुलाच्या आनंदी संसाराचे स्वप्न बघणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना त्याचे पार्थिवच बघावे लागल्याने, त्यांच्या वेदना काळीज पिळवटून टाकणाऱ्या होत्या.- सुधाकर रामचंद्र मानकर : सुधाकर चंद्रपूर कोलमाइन्समध्ये नोकरीला होते. लग्नासाठीच ते गावात आले होते. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. सुधाकर गेल्याने तिघा मायलेकांची स्थिती अत्यंत विदारक होती. नातेवाईक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.- विठ्ठल दिगंबर थोटे : ऑटो चालवून घराचा गाडा हाकणाऱ्या विठ्ठल यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मात्र, त्यांच्या संसाराला नजर लागली. त्यांच्या वडिलांचे अश्रू तर थांबता थांबत नव्हते.- रमेश ओमकार हेलोंडे : शेती करून प्रपंच चालविणाऱ्या रमेश यांच्या जाण्याने, त्यांचे शिक्षण घेणारी दोन्ही मुले वडिलांच्या छत्रछायेपासून वंचित झाली आहेत. पत्नीचा आधार गेल्याने तिची शुद्ध हरपल्यागत झाली होती. नातेवाईक तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.- अजय दशरथ चिखले : दोन मुलांचा बाप असलेल्या अजय यांची संपूर्ण मदार शेतीवर होती. कार्यक्रम आटोपून लवकर येतो, असे सांगून गेलेल्या बापाचा मृतदेह बघून मुलांनी आणि त्यांच्या पत्नीचा हंबरडा मन हेलावून सोडणारा होता. तिरडीपुढे आक्टं घेऊन चालणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाकडे बघून, सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव विषण्ण करणारे होते.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातDeathमृत्यू