शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

By योगेश पांडे | Updated: March 13, 2024 19:43 IST

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे.

नागपूर: शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होणार असून त्या दृष्टीने पुढील वर्षभर संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राहणार आहे. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल व यावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली. नागपुरात रेशीमबागेत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

तीन दिवसीय प्रतिनिधी संमेलनाच्या प्रस्तावांवर गुरुवारी संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. पंचपरिवर्तन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून दिली जाईल. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे गत काळात केलेल्या संघाच्या कार्याची माहिती देतील. तसेच आगामी योजनांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या वर्षभराच्या प्रवासाचे वेळापत्रकही ठरविण्यात येणार आहे. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या कार्याचा आणि विशेषत: संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याच्या लक्ष्याचा आढावा घेतला जाईल. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याबाबत विचारमंथनही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष येण्याची शक्यतासंघाच्या सभेला देशभरातून १५२९ प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीसाठी भाजपसह संघ परिवारातील ३६ संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही नागपुरात येण्याची शक्यता आहे.

नागपुरात सहा वर्षांनंतर बैठकसंघातर्फे दरवर्षी अ.भा.प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दर तीन वर्षांनी हे आयोजन मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होते. २०१८ मध्ये नागपुरात सभा झाली होती. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयोजन झाले नव्हते. अशा स्थिती सहा वर्षांनंतर प्रतिनिधी सभेचे रेशीमबागेत आयोजन करण्यात येत आहे.

अहिल्याबाईंचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करणार२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.हे चांगले वातावरण निर्माण होण्याचे शुभ लक्षण आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रैशताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ