शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

By योगेश पांडे | Updated: March 13, 2024 19:43 IST

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे.

नागपूर: शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होणार असून त्या दृष्टीने पुढील वर्षभर संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राहणार आहे. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल व यावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली. नागपुरात रेशीमबागेत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

तीन दिवसीय प्रतिनिधी संमेलनाच्या प्रस्तावांवर गुरुवारी संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. पंचपरिवर्तन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून दिली जाईल. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे गत काळात केलेल्या संघाच्या कार्याची माहिती देतील. तसेच आगामी योजनांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या वर्षभराच्या प्रवासाचे वेळापत्रकही ठरविण्यात येणार आहे. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या कार्याचा आणि विशेषत: संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याच्या लक्ष्याचा आढावा घेतला जाईल. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याबाबत विचारमंथनही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष येण्याची शक्यतासंघाच्या सभेला देशभरातून १५२९ प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीसाठी भाजपसह संघ परिवारातील ३६ संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही नागपुरात येण्याची शक्यता आहे.

नागपुरात सहा वर्षांनंतर बैठकसंघातर्फे दरवर्षी अ.भा.प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दर तीन वर्षांनी हे आयोजन मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होते. २०१८ मध्ये नागपुरात सभा झाली होती. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयोजन झाले नव्हते. अशा स्थिती सहा वर्षांनंतर प्रतिनिधी सभेचे रेशीमबागेत आयोजन करण्यात येत आहे.

अहिल्याबाईंचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करणार२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.हे चांगले वातावरण निर्माण होण्याचे शुभ लक्षण आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रैशताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ