शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

By योगेश पांडे | Updated: March 13, 2024 19:43 IST

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे.

नागपूर: शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होणार असून त्या दृष्टीने पुढील वर्षभर संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राहणार आहे. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल व यावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली. नागपुरात रेशीमबागेत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

तीन दिवसीय प्रतिनिधी संमेलनाच्या प्रस्तावांवर गुरुवारी संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. पंचपरिवर्तन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून दिली जाईल. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे गत काळात केलेल्या संघाच्या कार्याची माहिती देतील. तसेच आगामी योजनांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या वर्षभराच्या प्रवासाचे वेळापत्रकही ठरविण्यात येणार आहे. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या कार्याचा आणि विशेषत: संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याच्या लक्ष्याचा आढावा घेतला जाईल. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याबाबत विचारमंथनही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष येण्याची शक्यतासंघाच्या सभेला देशभरातून १५२९ प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीसाठी भाजपसह संघ परिवारातील ३६ संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही नागपुरात येण्याची शक्यता आहे.

नागपुरात सहा वर्षांनंतर बैठकसंघातर्फे दरवर्षी अ.भा.प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दर तीन वर्षांनी हे आयोजन मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होते. २०१८ मध्ये नागपुरात सभा झाली होती. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयोजन झाले नव्हते. अशा स्थिती सहा वर्षांनंतर प्रतिनिधी सभेचे रेशीमबागेत आयोजन करण्यात येत आहे.

अहिल्याबाईंचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करणार२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.हे चांगले वातावरण निर्माण होण्याचे शुभ लक्षण आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रैशताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ