शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर २८१ विनातिकीट प्रवासी

By नरेश डोंगरे | Updated: June 11, 2024 20:04 IST

नागपूर-मुंबई मार्गावर अचानक तिकीट तपासणी.

नागपूर: मध्य रेल्वेकडून अचानक सोमवारी एका रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वैध तिकिटांशिवाय प्रवास करताना २८१ प्रवासी आढळले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून रेल्वे प्रशासनाने पावणेदोन लाखांचा दंड वसूल केला. रेल्वेगाड्यांत एकीकडे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. दुसरीकडे काही फुकटे प्रवासी बिनधास्त पाहिजे तेथून पाहिजे त्या ठिकाणी प्रवास करतात. 

जनरलचे तिकीट असताना चक्क एसीच्या डब्यात गर्दी करतात. जागा नसल्याने ते थेट बाथरूमच्या दारापाशीही गर्दी करून असतात. परिणामी खूप दिवसांपूर्वी रिझर्वेशन करून कन्फर्म तिकीट मिळवत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रवाशांना अवैध प्रवास करणाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार लक्षात घेत वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ नये आणि अवैध प्रवास करणाऱ्यांना धडा मिळावा, या हेतूने मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने विशेष कारवाईची मोहीम आखली आहे. 

त्यानुसार, नागपूर - मुंबई मार्गावर वर्धा रेल्वे स्थानकावर २ आरपीएफ कर्मचारी आणि १८ तिकीट निरीक्षकांनी अचानक तिकीट तपासणी सुरू केली. या तपासणीत काही तासांतच २८१ अवैध प्रवासी हाती लागले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने १ लाख, ७२ हजारांची रक्कम दंडापोटी वसूल केली. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहनरेल्वेचा प्रवास आनंददायक आणि आरामदायक व्हावा यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि ज्या श्रेणीचे तिकीट घेतले, त्याच श्रेणीच्या डब्यात बसून प्रवास करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcentral railwayमध्य रेल्वे