शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

इम्रानने नागपुरात मारला होता बिर्याणीवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 10:07 IST

विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे.

ठळक मुद्देविश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधान थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे. जगभरातील मातब्बर फलंदाजांना वेगवान चेंडूमुळे घाम फोडणारा इम्रान भेदक गोलंदाजीच्या बळावर नवी उंची गाठण्यात यशस्वी ठरला. या खेळाडूचे नागपूर कनेक्शनही जुनेच आहे. १९८७ आणि १९८९ साली इम्रानने दोन वन डे खेळण्यासाठी या शहराचा दौरा केला तेव्हा मोमिनपुऱ्यातील प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मारला अन् सीताबर्डीवर शॉपिंगही केले होते.२४ मार्च १९८७ ला पाकने येथे भारताविरुद्ध वन डे खेळला. या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या इम्रानने ६५ चेंडूत ७३ धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत मात्र १० षटकांत त्याला केवळ रवी शास्त्रीचा बळी घेता आला. अष्टपैलू कामगिरी करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला होता.पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा इम्रानच्याच नेतृत्वात नागपुरात आला तो ३० आॅक्टोबर १९८९ साली. एमआरएफ नेहरू चषकाचा उपांत्य सामना पाक-इंग्लंड यांच्यात होता. पावसामुळे प्रत्येकी ३०-३० षटकांच्या लढतीत पाकने सहा गड्यांनी बाजी मारली. या सामन्यात रमीझ राजाचा नाबाद ८५ धावांचा तसेच सलीम मलिकचा ६६ धावांचा झंझावात नागपूरचे क्रिकेटप्रेमी अद्याप विसरले नसतील. रमीझने मारलेल्या एक उत्तुंग षटकारावर स्टेडियमबाहेर आॅल सेंट चर्चपर्यंत चेंडू गेल्याच्या आठवणीला त्यावेळी आयोजनात असलेल्या व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला.हा सामना जिंकल्यानंतरही इम्रानने आपल्या सहकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. इम्रानचा संघात असा दरारा होता की, जेव्हा तो झापायचा तेव्हा सहकारी त्याच्या नजरेला नजर भिडवीत नसत. ‘कप्तान’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला इम्रान सहकाऱ्यांमध्ये विजिगिषुवृत्ती जागविण्यातही माहीर होता, असे त्या सामन्यात स्कोअरिंग करणारे चंद्रशेखर कारकर यांनी सांगितले.नंतर वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात नमवून पाकिस्तानने ही स्पर्धाही जिंकली. देशासाठी इम्राने जिंकून दिलेले हे पहिले जेतेपद होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मानही अर्थात इम्रानच्या वाट्याला आला होता.त्यावेळी सिव्हिल लाईन्सच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सामने खेळविले जायचे. शेजारीच असलेल्या रविभवन परिसरात उभय संघांची निवास व्यवस्था असायची. सुरक्षेचा फारसा त्रास नसल्याने अनेक पाहुणे खेळाडू मोमिनपुरा भागातील बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी जायचे. पाकिस्तानचे खेळाडूदेखील याला अपवाद नव्हते. कपिल देव आणि इम्रान खान यांच्यात इतकी घट्ट मैत्री होती की, दोघेही मैदानाबाहेर अनेकदा सोबत वावरायचे. सीताबर्डीवर खरेदीच्या निमित्ताने अनेक खेळाडूंना मार्केटचा फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी त्यावेळी पी.टी. लुले यांच्याकडे असायची.८८ कसोटी तसेच १७५ वन डेतून कौशल्य दाखविणाऱ्या इम्रानने अनेकदा स्वत:ची भूमिका कशी योग्य आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वादग्रस्तही ठरला, पण डगमगला नाही. पाकिस्तानच्या राजकारणात इतिहास नोंदवण्याआधी, इम्रान खानने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला होता. १९९२ साली इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत इंग्लंडवर मात केली. अंतिम सामन्यात इम्रानने फलंदाजी व गोलंदाजीतही स्वत:ची छाप पाडली. फलंदाजीदरम्यान पाकिस्तानचे पहिले दोन फलंदाज अवघ्या २४ धावांमध्ये माघारी परतले होते. यानंतर इम्रान खानने जावेद मियांदादसोबत १३९ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या संघाच्या विजयाची पायाभरणी केली. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या. यावेळी इम्रानने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. रिचर्ड इलिंगवर्थला बाद करत इम्रानने पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विश्वचषक जिंकताच त्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली होती.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान