शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

इम्रानने नागपुरात मारला होता बिर्याणीवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 10:07 IST

विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे.

ठळक मुद्देविश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधान थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे. जगभरातील मातब्बर फलंदाजांना वेगवान चेंडूमुळे घाम फोडणारा इम्रान भेदक गोलंदाजीच्या बळावर नवी उंची गाठण्यात यशस्वी ठरला. या खेळाडूचे नागपूर कनेक्शनही जुनेच आहे. १९८७ आणि १९८९ साली इम्रानने दोन वन डे खेळण्यासाठी या शहराचा दौरा केला तेव्हा मोमिनपुऱ्यातील प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मारला अन् सीताबर्डीवर शॉपिंगही केले होते.२४ मार्च १९८७ ला पाकने येथे भारताविरुद्ध वन डे खेळला. या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या इम्रानने ६५ चेंडूत ७३ धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत मात्र १० षटकांत त्याला केवळ रवी शास्त्रीचा बळी घेता आला. अष्टपैलू कामगिरी करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला होता.पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा इम्रानच्याच नेतृत्वात नागपुरात आला तो ३० आॅक्टोबर १९८९ साली. एमआरएफ नेहरू चषकाचा उपांत्य सामना पाक-इंग्लंड यांच्यात होता. पावसामुळे प्रत्येकी ३०-३० षटकांच्या लढतीत पाकने सहा गड्यांनी बाजी मारली. या सामन्यात रमीझ राजाचा नाबाद ८५ धावांचा तसेच सलीम मलिकचा ६६ धावांचा झंझावात नागपूरचे क्रिकेटप्रेमी अद्याप विसरले नसतील. रमीझने मारलेल्या एक उत्तुंग षटकारावर स्टेडियमबाहेर आॅल सेंट चर्चपर्यंत चेंडू गेल्याच्या आठवणीला त्यावेळी आयोजनात असलेल्या व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला.हा सामना जिंकल्यानंतरही इम्रानने आपल्या सहकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. इम्रानचा संघात असा दरारा होता की, जेव्हा तो झापायचा तेव्हा सहकारी त्याच्या नजरेला नजर भिडवीत नसत. ‘कप्तान’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला इम्रान सहकाऱ्यांमध्ये विजिगिषुवृत्ती जागविण्यातही माहीर होता, असे त्या सामन्यात स्कोअरिंग करणारे चंद्रशेखर कारकर यांनी सांगितले.नंतर वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात नमवून पाकिस्तानने ही स्पर्धाही जिंकली. देशासाठी इम्राने जिंकून दिलेले हे पहिले जेतेपद होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मानही अर्थात इम्रानच्या वाट्याला आला होता.त्यावेळी सिव्हिल लाईन्सच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सामने खेळविले जायचे. शेजारीच असलेल्या रविभवन परिसरात उभय संघांची निवास व्यवस्था असायची. सुरक्षेचा फारसा त्रास नसल्याने अनेक पाहुणे खेळाडू मोमिनपुरा भागातील बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी जायचे. पाकिस्तानचे खेळाडूदेखील याला अपवाद नव्हते. कपिल देव आणि इम्रान खान यांच्यात इतकी घट्ट मैत्री होती की, दोघेही मैदानाबाहेर अनेकदा सोबत वावरायचे. सीताबर्डीवर खरेदीच्या निमित्ताने अनेक खेळाडूंना मार्केटचा फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी त्यावेळी पी.टी. लुले यांच्याकडे असायची.८८ कसोटी तसेच १७५ वन डेतून कौशल्य दाखविणाऱ्या इम्रानने अनेकदा स्वत:ची भूमिका कशी योग्य आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वादग्रस्तही ठरला, पण डगमगला नाही. पाकिस्तानच्या राजकारणात इतिहास नोंदवण्याआधी, इम्रान खानने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला होता. १९९२ साली इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत इंग्लंडवर मात केली. अंतिम सामन्यात इम्रानने फलंदाजी व गोलंदाजीतही स्वत:ची छाप पाडली. फलंदाजीदरम्यान पाकिस्तानचे पहिले दोन फलंदाज अवघ्या २४ धावांमध्ये माघारी परतले होते. यानंतर इम्रान खानने जावेद मियांदादसोबत १३९ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या संघाच्या विजयाची पायाभरणी केली. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या. यावेळी इम्रानने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. रिचर्ड इलिंगवर्थला बाद करत इम्रानने पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विश्वचषक जिंकताच त्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली होती.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान