शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

नागपुरातील कचरा संकलनात सुधारणा करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:15 IST

अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकचरा विलगीकरणात अडचणी : लेखाजोखा सादर करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कंपन्यांनाही अधिक सजगतेने काम करावे लागत आहे. ए.जी. एनव्हायरो या कंपनीला झोन क्र. १ ते ५ व बीव्हीजी या कंपनीला झोन क्र. ६ ते १० अशा प्रत्येकी पाच झोनची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पहिल्या पाचपैकी तीन झोनमधील अनेक वस्त्यात कचरा संकलनाबाबत तक्रारी आहेत. हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या तीन झोनमधील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता केली जाते. परंतु अंतर्गत भागात आजही कचरा संकलनाच्या तक्रारी आहेत. या झोनमधील तक्रारींपेक्षा बीव्हीजी कंपनीबद्दलच्या तक्रारी अधिक आहेत. आसीनगर झोनमध्ये अनेक शिष्टमंडळांनी कंपनीविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. महापौर व आयुक्तांपर्यंत या तक्रारी गेल्या आहेत. हीच स्थिती सतरंजीपुरा, लकडगंज व मंगळवारी झोनबद्दलही आहे. वर्दळीचा परिसर चकाचक करण्यात येतो. दर्शनीभाग अधिक काळ नजरेसमोर असतो, अशा भागांवर अधिक लक्ष दिले जात आहे. तुलनेत झोपडपट्ट्या व दाटीवाटीच्या भागातील कचरा रोज संकलित करण्यात येत नाही, अशा तक्रारी आहेत. शिवाय, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न या भागातील नागरिकांचा आहे. दोन दिवस कचरा साठविल्यानंतर तिसऱ्या दिवशी कचरा उचलणारी वाहने येतात, अशा बाबीही समोर येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या सर्व बाबींची माहिती घेतल्याचे कळते. कंपनीला आतापर्यंत सात लाखांवर दंडही ठोठावण्यात आला आहे.विलग संकलनाची व्यवस्था नाहीनागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात आले आहे. परंतु याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे कचरा संकलन करणाऱ्या अनेक गाड्यात एकत्रच कचरा संकलित केला जातो. घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा दिला जात नाही. दुसरीकडे नागरिकांकडून देण्यात येणारा कचरा तसाच गाडीत टाकण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्येही एकत्रित कचरा साठविला जातो.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न