शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

राज्यनाट्य स्पर्धेत ‘अश्वघोष...’ चा ठसा : उपराजधानीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:00 IST

उपराजधानीच्या बहुजन रंगभूमीची निर्मिती आणि नाट्यकर्मी वीरेंद्र गणवीर यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या हिंदी नाटक ‘भारतीय रंगमंच के आद्यनाटककार भदंत अश्वघोष’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. हिंदी भाषिक गटात या नाटकाने अभिनयाच्या प्रथम पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत. गोव्याला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देअभिनयाचे प्रथम, पाच पुरस्कारांची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या बहुजन रंगभूमीची निर्मिती आणि नाट्यकर्मी वीरेंद्र गणवीर यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या हिंदी नाटक ‘भारतीय रंगमंच के आद्यनाटककार भदंत अश्वघोष’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. हिंदी भाषिक गटात या नाटकाने अभिनयाच्या प्रथम पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत. गोव्याला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.इ.स. पूर्व पहिल्या शतकातील भदंत अश्वघोष यांची भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार म्हणून ओळख आहे. युनानी नाटकांनी प्रभावित झालेल्या अश्वघोष यांनी भारतात याप्रकारे नाटकांची निर्मिती केली. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अश्वघोष यांनी बौद्ध धम्म ग्रहण करून धम्मप्रसारासाठी नाट्यकलेचा उपयोग केला. त्यांच्या जीवनावर आधारीत ‘अश्वघोष’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याची किमया बहुजन रंगभूमीच्या माध्यमातून वीरेंद्र गणवीर यांनी केली आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शनासह त्यांनी यात अभिनयही केला आहे. हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत त्यांनी याचे लेखन केले आहे. नाटकात त्यांच्यासह श्रेयस अतकर यांनी अश्वघोष यांची भूमिका साकारली. सोबत अस्मिता पाटील (प्रभा- अश्वघोषांची प्रेयसी) व जुहील उके याने भदंत धर्मसेन यांची भूमिका साकारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी हिंदी भाषेतून प्रवेश घेतला होता. राज्य स्पर्धेंतर्गत १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे या नाटकाचा प्रयोग झाला. अश्वघोषावर सादर झालेली देशातील ही पहिलीच कलाकृती असून त्यास राज्य नाट्य स्पर्धेने सन्मानित केले आहे.नाटकात अश्वघोषाची भूमिका करणाऱ्या श्रेयस अतकर यास अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. याशिवाय दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी रंगभूषा व वेशभुषेचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. नाटकाची प्रकाश व्यवस्था सांभाळणारे किशोर बत्तासे यांनाही पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यभरातून सादर झालेल्या ५२ नाटकांपैकी अश्वघोषला निर्मितीचा चौथा पुरस्कार आणि रौप्य पदक प्राप्त झाल्याची माहिती वीरेंद्र गणवीर यांनी दिली. हे पुरस्कार जाहीर झाल्याने बहुजन रंगभूमीच्या माध्यमातून उपराजधानीच्या नाट्यसृष्टीचा गौरव वाढविला आहे.

 

 

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर