शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 8, 2023 19:20 IST

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स (सुधारणा) कायदा, २०२३’ लागू केला आहे.

नागपूर: महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स (सुधारणा) कायदा, २०२३’ लागू केला आहे. त्यामध्ये अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा शुल्क  अधिनियम आणि नियमाच्या तुलनेत अनेक पटींनी वाढविण्यात आले आहे. या दरवाढीचा विपरित परिणाम महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीवर होणार आहे. या शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची विनंती विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) राज्य सरकारकडे केली आहे. 

वाढविलेले शुल्क आता वार्षिक स्टेटमेंट ऑफ रेट्सशी (एएसआर) त्याच्या गुणवत्तेनुसार बांधकाम दरांच्या टक्केवारीशी जोडलेले आहे. हे अतार्तिक असल्याचा व्हीटीएचा आरोप आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय (सुधारणा) अधिनियम, २०२३ नुसार निवासी इमारतींवर ०.२५ ते ०.५० टक्के, संस्थात्मक इमारतींसाठी ०.५० ते ०.७० टक्के आणि व्यावसायिक इमारतींसाठी ०.७० ते एक टक्के दर आहेत. दरांचे विवरण (एएसआर) विचाराधीन इमारतीच्या एकूण बिल्टअप क्षेत्राद्वारे गुणाकार केले जाते. या बिल्ट-अप एरियामध्ये तळघर, आराम, स्टिल्ट, पोडियम, जिने, लिफ्ट, लॉबी, पॅसेज, बाल्कनी, कॅन्टिलिव्हर भाग, सेवा मजले आणि आश्रय क्षेत्र यांचा समावेश होतो.

अग्निशमन कायद्यानुसार अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा शुल्क लागू होण्याची प्रक्रिया योग्य आहे, पण आता संपूर्ण बांधलेल्या क्षेत्रावर आकारले जाणारे शुल्क हे प्रत्येक इमारतीचे एकूण शुल्क लाख आणि कोटी रुपयांमध्ये घेत आहे. व्हीटीएचे सचिव तेजिंदर सिंग रेणू म्हणाले, अशा शुल्कामुळे केवळ अपार्टमेंटच्या खर्चातच भर पडते असे नाही, तर त्याचा बोजा शेवटी ग्राहकावर पडतो आणि सर्वात मोठा फटका संस्थात्मक आणि औद्योगिक इमारतीला बसतो. असा खर्च भांडवली गुंतवणूक बनतो. मुख्य कॉर्पसमध्ये जोडला जातो. एवढा मोठा भांडवली बोजा महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यापासून परावृत्त करतो. आजकाल योजना मंजुरीसाठीही कोट्यवधी रुपये योजना मंजुरी शुल्क म्हणून आकारले जातात आणि आता हे अग्निशमन शुल्क अतार्किक आणि अनैतिक अतिरिक्त भार आहे.

वाढीव दरवाढीवर पुनर्विचार करण्याची विनंती व्हीटीएने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, मुंबईचे संचालक एस. एस. वॉरिक आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना पत्राद्वारे केली आहे. अग्निशमन सेवा शुल्क असामान्यपणे जास्त आहे आणि ते सार्वजनिक हितासाठी तार्किक टक्केवारीपर्यंत कमी करावे, असे व्हीटीएने म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर