शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी : गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 23:46 IST

Home Minister Dilip Walse Patil राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्रीपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना नोंदविले. सोबतच पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी, अशी टिपणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देगडचिरोलीच्या भेटीनंतर नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्रीपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना नोंदविले. सोबतच पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी, अशी टिपणीही त्यांनी केली.

गृहमंत्र्यांचा पदभार सांभाळल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच नागपुरात आले. आज सकाळी गडचिरोलीत घडलेल्या चकमकीचे वृत्त कळताच ते तिकडे गेले. सायंकाळी गडचिरोलीतून परतल्यानंतर, त्यांनी स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यानंतर, पोलीस जिमखान्यात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील. त्यांचा हा कटाक्ष राज्य पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे आरोप जडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने होता. आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्याच्या संबंधाने लागलेले आरोप-प्रत्यारोप आणि घडणाऱ्या घडामोडी या संबंधाने गृहमंत्री वळसे-पाटील फारसे बोलले नाही. मात्र, कोरोनामुळे राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशात आपल्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी येणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. अभ्यास आणि नियोजन करून आपण पोलीस विभागासाठी काही नवीन उपाययोजना अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात शारीरिक दुखापतीचे गुन्हे जास्त आहेत. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. पोलीस भरतीसाठी तीन लाख अर्ज आले. भरती प्रक्रियेच्या संबंधाने लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.

गडचिरोली पोलिसांचे कौतुक

२१ मे, २००९ रोजी नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. गडचिरोली पोलिसांनी केलेली आजची ही कारवाई बदला नव्हे, तर एक योगायोग आहे. नक्षल्यांना कंठस्थान घालणाऱ्या आजच्या कारवाईबद्दल त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliceपोलिस