शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयएमए : पदव्युत्तर प्रवेशापूर्वी बंधपत्रित सेवा गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:00 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण करा किंवा बंधपत्रित दंडाचे १० लाख रुपये भरा, हा शासन निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत मांडले.

ठळक मुद्देबंधपत्रित दंडाची रक्कम १० लाख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण करा किंवा बंधपत्रित दंडाचे १० लाख रुपये भरा, हा शासन निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत मांडले.पत्रपरिषदेला आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. संजय देशपांडे व डॉ. प्रदीप अरोरा उपस्थित होते.डॉ. दिसावल म्हणाले, एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करायला विद्यार्थ्याला साडेचार वर्षे लागतात. त्यानंतर एमडी व पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारण १० वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. परंतु शासन वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही. नुकताच घेतलेला हा निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधातील आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते बंधपत्रित दंडाचे १० लाख रुपये भरून मोकळे होतील आणि ज्यांच्याकडे पैसा नाही ते बंधपत्रित सेवा देतील.गरीब विद्यार्थी अडचणीतडॉ. संजय देशपांडे म्हणाले, एमबीबीएसनंतर एक वर्षाच्या इन्टर्नशिपमध्ये विद्यार्थी दिवसा रुग्णसेवा देतो आणि रात्री पदव्युत्तर प्रवेशासाठी ‘नीट पीजी’च्या परीक्षेची तयारी करतो. मोठ्या कष्टाने तो ही परीक्षा पास करतो. परंतु अचानक शासन निर्णय घेते की, पदव्युत्तर प्रवेशापूर्वी एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण करावी लागणार किंवा दंड भरावा लागणार. यामुळे गरीब विद्यार्थी अडचणीत आला आहे. ‘आयएमए’चा बंधपत्रित सेवेला विरोधा नाही. परंतु ती जुन्या पद्धतीनुसार पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर किंवा त्यापुढे त्यांनी ती सेवा द्यावी किंवा शुल्क भरावे एवढीच मागणी आहे.राज्यासाठीच हा नियम का ?डॉ. लद्धड म्हणाले, पदव्युत्तर प्रवेशापूर्वी बंधपत्रित सेवा द्या किंवा बंधपत्रित दंड भरा, हा नियम केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच आहे. इतर राज्यामध्ये हा नियम नाही. खासगी वैद्यकीय कॉलेजमध्येसुद्धा हा नियम लागू होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हा भेदभाव करणे चुकीचे आहे. ग्रामीण सेवेचे व्रत गरीब विद्यार्थ्यांनीच का घ्यावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार, पदे ८००डॉ. वाय.एस. देशपांडे म्हणाले, दरवर्षाला साधारण एमबीबीएसचे तीन हजार विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी ८०० पदे आहेत. यामुळे इतर विद्यार्थी अडचणीत येतात. शासनाने या पदांची निर्मिती न करताच नवा निर्णय लादणे योग्य नाही. विशेष म्हणजे, ज्या भागात बंधपत्रित सेवा दिली जाते, शासन तिथे सोयही उपलब्ध करून देत नाही. धक्कादायक म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांची जिथे गरज आहे, तिथेही पाठविण्याचे सौजन्य दाखवित नाही.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयscienceविज्ञान