शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:14 IST

महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे राणी बंग : इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थेशियालॉजिस्टचा पदग्रहण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट महाराष्टÑ राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनीता लवंगे व सचिव डॉ. उमेश रामतानी यांनी पदभार स्वीकारला.डॉ. बंग म्हणाल्या, गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात केवळ दोन स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आहेत. बधिरीकरण तज्ज्ञ तर नावालाही नाही. यामुळे शस्त्रक्रियांवर याचा प्रभाव पडतो, असे भयानक चित्र आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनांचाही लाभ गडचिरोलीतील रुग्णांपर्यंत पोहोचत नाही. कारण अनेकांकडे या योजनेतील रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा नसतो. शासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.प्रास्ताविक मावळत्या सचिव डॉ. गौरी अरोरा यांनी केले तर गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती मावळते अध्यक्ष डॉ. शीतल दलाल यांनी दिली. येत्या वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती डॉ. सुनीता लवंगे यांनी दिली. आभार डॉ. उमेश रामतानी यांनी मानले.-बधिरीकरण तज्ज्ञ पडद्यामागील कलावंतडॉ. बंग म्हणाल्या, बधिरीकरण शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेच दुर्गम भागातही यशस्वीरीत्या सर्जरी करणे शक्य झाले आहे. हे डॉक्टर पडद्यामागील कलावंत आहेत. भूलतज्ज्ञ म्हणजे माणसाशी माणसासारखं नातं जपणारा डॉक्टर आहे, असे म्हणत त्यांनी समाजात डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असल्याचे सांगून, बधिर झालेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्यही प्रत्येकाने हाती घेण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिला