शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट

By मंगेश व्यवहारे | Updated: December 26, 2022 09:57 IST

हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर यंत्रणा इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते.

मंगेश व्यवहारे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांच्या दंडापासून बचावण्यासाठी करतात. त्यामुळे दर्जाहीन हेल्मेट वापरले जाते. अशात एखादा छोटा अपघातही जीवघेणा ठरू शकतो. हेल्मेट डोक्याच्या सुरक्षेसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ते दर्जेदार असायला हवे. ते नीट वापरले गेले पाहिजे, त्यासाठी नागपुरातील ऑटोमोबाइलतज्ज्ञ निखिल उंबरकर यांनी हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच होणार नाही, असे सर्किट तयार केले आहे. तेही अवघ्या ७० रुपयांत. 

निखिल यांनी आपल्या दुचाकीत हे उपकरण लावले आहे. हेल्मेट घालून त्याचा बेल्ट व्यवस्थित लावत नाहीत, तोपर्यंत त्यांची दुचाकी सुरू होत नाही. निखिल हे अनेक वर्षांपासून अपघातमुक्त वाहतुकीसाठी संशोधन करीत आहेत. त्यातूनच हे सर्किट तयार झाले आहे. या सर्किटचा स्वत: वापर करीत आहेत. हेल्मेट घातल्यानंतरही किरकोळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू होतो. यामागच्या कारणांचा निखिल यांनी अभ्यास केला. या अभ्यासात हेल्मेट अनेकजण केवळ पोलिसांच्या सक्तीपासून बचाव करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

गाडी देते इशारा 

गाडीच्या इग्निशनला सेंसर लावले आहे. आयआर रिसीव्हर, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, बॅटरी आदी वापरून हे सर्किट तयार केले आहे. ते गाडीत इन्स्टॉल केले आहे. त्यामुळे गाडी हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते. अशी मिळाली प्रेरणा

दुचाकीस्वार हेल्मेटच्या नावाने काहीही वापरत असल्याचे निखिल यांना निरीक्षणातून दिसून आले. काही बहाद्दर तर कोलमाईन्समध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे असलेल्या टोप्या हेल्मेट म्हणून वापरत असल्याचे दिसले. अनेकजण हेल्मेट केवळ डोक्यात टाकतात, पण बेल्ट लावत नाहीत. अशात अपघात झाल्यास किंवा दुचाकीवरून पडल्यास हेल्मेट एकीकडे आणि दुचाकीस्वार दुसरीकडे असे बरेचदा त्यांना दिसले. असे दर्जाहीन हेल्मेट वापरल्यामुळे किरकोळ अपघातदेखील गंभीर ठरतो, हे लक्षात आल्यानंतर निखिल यांनी संशोधन सुरू केले.

स्वत: च्या सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे

पोलिसांच्या भीतीने नाही, तर स्वत: च्या सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे आहे. याची सवय दुचाकीस्वारांना लागावी, म्हणून हे सर्किट तयार केले आहे. -निखिल उंबरकर, ऑटोमोबाइलतज्ज्ञ.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :nagpurनागपूरtwo wheelerटू व्हीलर