शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पदवी हवी असेल तर नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा द्या : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:37 IST

विद्यापीठाचे फर्मान : बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बीबीए, बी.कॉम.ची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांनी शेवटचे दोन सेमिस्टर नव्या अभ्यासक्रमाने केले, पण पहिले चार सेमिस्टर जुन्या अभ्यासक्रमाने केल्याने पदवी देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या विषयांची परीक्षा पुन्हा द्या, तरच पदवी मिळेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

या विद्यार्थ्यांनी नुकतीच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, विद्यापीठाकडून पुन्हा परीक्षा देण्याचा आग्रह केला जात असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी नुकतीच ५ व्या व ६ व्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन शेवटच्या सेमिस्टरला त्यांनी नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांचे १ ते ४ सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांनुसार झाली होती. शेवटचे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीची गुणपत्रिका मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, या विद्यार्थ्यांचा निकाल विथल्डमध्ये टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी विचारणा करायला गेले असता, विद्यापीठाने १ ते ४ सेमिस्टरमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन कोर्सच्या विषयांची पुन्हा परीक्षा देण्याचे व त्यानंतरच पदवीची गुणपत्रिका मिळेल, असे आदेश विद्यापीठाने काढले आहेत. त्यामुळे बीबीए, बी. कॉमचे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. 

प्रत्येक सेमिस्टरमध्ये दोन विषय समाविष्टमिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक सेमिस्टरमध्ये नव्या अभ्यासक्रमाचे दोन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ८ विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. त्यासाठी पदवी पूर्ण करूनही पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. ही परीक्षा एकावेळी झाली, तर गोंधळ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळविशेष म्हणजे पदवी पूर्ण केल्याची गुणपत्रिकाच मिळणार नाही, तर त्यांना एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे उत्तीर्ण झाल्यानंतरही हे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाकडून अशाप्रकारे वेळेवर परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर