शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

पदवी हवी असेल तर नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा द्या : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:37 IST

विद्यापीठाचे फर्मान : बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बीबीए, बी.कॉम.ची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांनी शेवटचे दोन सेमिस्टर नव्या अभ्यासक्रमाने केले, पण पहिले चार सेमिस्टर जुन्या अभ्यासक्रमाने केल्याने पदवी देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या विषयांची परीक्षा पुन्हा द्या, तरच पदवी मिळेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

या विद्यार्थ्यांनी नुकतीच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, विद्यापीठाकडून पुन्हा परीक्षा देण्याचा आग्रह केला जात असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी नुकतीच ५ व्या व ६ व्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन शेवटच्या सेमिस्टरला त्यांनी नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांचे १ ते ४ सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांनुसार झाली होती. शेवटचे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीची गुणपत्रिका मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, या विद्यार्थ्यांचा निकाल विथल्डमध्ये टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी विचारणा करायला गेले असता, विद्यापीठाने १ ते ४ सेमिस्टरमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन कोर्सच्या विषयांची पुन्हा परीक्षा देण्याचे व त्यानंतरच पदवीची गुणपत्रिका मिळेल, असे आदेश विद्यापीठाने काढले आहेत. त्यामुळे बीबीए, बी. कॉमचे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. 

प्रत्येक सेमिस्टरमध्ये दोन विषय समाविष्टमिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक सेमिस्टरमध्ये नव्या अभ्यासक्रमाचे दोन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ८ विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. त्यासाठी पदवी पूर्ण करूनही पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. ही परीक्षा एकावेळी झाली, तर गोंधळ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळविशेष म्हणजे पदवी पूर्ण केल्याची गुणपत्रिकाच मिळणार नाही, तर त्यांना एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे उत्तीर्ण झाल्यानंतरही हे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाकडून अशाप्रकारे वेळेवर परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर