शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

ही चूक कराल तर पडेल टक्कल ! बोरवेलच्या पाण्यामुळे केस गळतीचा वाढला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:50 IST

Nagpur : ताणतणाव, आनुवंशिकता, आणि औषधांच्या दुष्परिणामामुळे केसगळती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अलीकडे केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. पोषक आहाराचा अभाव, दीर्घकालीन ताणतणाव, आनुवंशिकता, संप्रेरकांमध्ये बदल किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यामुळे केस गळू शकतात. केस गळण्याचे आणखी एक कारण म्हणजे बोअरवेलचे पाणी. सध्या बहुतांश घरात बोअरवेलच्या पाण्याचा वापर होतो. या पाण्यामध्ये असणाया अतिरिक्त क्षारांचा परिणाम त्वचेवर व केसांवर होतो. पाण्यात सल्फेट जरी जास्त असले, तरी टक्कल पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन त्वचारोग तज्ज्ञांनी केले आहे.

अंघोळीसाठी कुठले पाणी वापराल? अंघोळीसाठी सर्वोत्तम पाणी म्हणजे कोमट पाणी; अति गरम पाण्यामुळे तुमचे केस कोरडे होऊ शकतात व केसगळती सुरू होऊ शकते.

पाण्यातील या घटकांमुळे केसगळती काही भागात, नळाच्या पाण्यात क्लोरिन, क्लोरामाइन आणि कीटकनाशके यांसारखी विरघळलेली रसायने जास्त प्रमाणात असू शकतात. बोअरवेलच्या पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा केसांना धोका पोहचू शकतो. शिसे, आर्सेनिक, लोह, क्रोमियम ६, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या जड धातूंनी पाणी दूषित होत असल्यास देखील केस आणि त्वचेच्या विविध समस्या उदभवू शकतात.

पाण्यातील सल्फेट केसांवर कसे परिणाम करते त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांनी सांगितले, पाण्यात जर सेल्फेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. सल्फेटस केसांमधून ओलावा काढून टाकू शकतो. ज्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, ठिसूळ होऊ शकतात, केसांना फाटे फुटू शकतात आणि निस्तेज होऊ शकतात. सल्फेटमुळे टाळू कोरडी होऊ शकते आणि खाज होऊ शकते. तसेच, सल्फेटसमुळे केसांचा रंग फिकट होऊ शकतो.

केसगळतीने डोक्याला ताप! केसगळती सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना कोणती असेल, तर टक्कल पडणे. त्यातच केस गळतीवरील असंख्य उत्पादनांच्या जाहिरातीचा परिणाम मनावर होतो. एकूणच केसगळतीने डोक्याला ताप झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

टीडीएस किती हवा? केसांसाठी पाण्यातील टीडीएस २०० पीपीएमच्या आत असायला हवे. टीडीएस ३०० पीपीएमपेक्षा जास्त आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, क्लोराइड व सल्फेटचे प्रमाण जास्त असते.

"बोअरवेलच्या पाण्यामधील खनिज घटकांमुळे पाणी हे जड होते. या जड पाण्याचा आपल्या टाळूवर खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये जास्त परिणाम होतो व केसगळतीस सुरुवात होते. त्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी व्यतिरिक्त पाण्याचादेखील आपल्या केसगळतीवर भयंकर परिणाम होतो. याकडे कानाडोळा करून चालणार नाही."- डॉ. श्रद्धा महल्ले, त्वचारोग तज्ज्ञ 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीLifestyleलाइफस्टाइलnagpurनागपूर