शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जबाबदारीला न्याय देऊ शकत नसाल तर, नियोजन बंद करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:15 IST

Nagpur : हायकोर्टाचे राज्य सरकारवर कडक ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरांच्या विकास आराखड्यांमध्ये विविध उद्देशांकरिता निर्धारित केलेले जमिनींचे आरक्षण राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणांच्या निष्क्रियतेमुळे रद्द होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गंभीर भूमिका घेतली. तुम्ही जबाबदारीला न्याय देऊ शकत नसाल तर नियोजन विभागच बंद करून टाका, असे ताशेरे न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले.

नियोजन विभागाने ३० जून १९९८ रोजी मंजूर केलेल्या चंद्रपूर शहराच्या विकास आराखड्यामध्ये खुटाळा येथील जमीन (ख. क्र. ११३/७) उद्यानाकरिता आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर सक्षम प्राधिकरण म्हाडाने ही जमीन दहा वर्षांच्या कालावधीत संपादित करणे बंधनकारक होते. परंतु, म्हाडा २०२० पर्यंत झोपून राहिले. जमीन मालक शकिला खोब्रागडे यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी जमीन संपादनाची नोटीस पाठविल्यानंतर म्हाडाला जाग आली व त्यांनी ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारला ५२ कोटी रुपयांची मागणी केली.

परंतु, सरकारने ही रक्कम दिली नाही. परिणामी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील कलम १२७अनुसार या जमिनीचे आरक्षण डिसेंबर-२०२२ मध्ये रद्द झाले. करिता, खोब्रागडे यांनी ही जमीन परत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व आधीचे अनुभव लक्षात घेता राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले. तसेच या जमिनीचे आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर करून यासंदर्भात चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. 

केवळ राज्य सरकार व म्हाडाच्या निष्काळजीपणामुळे जमिनीचे आरक्षण रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली. हे चित्र अतिशय निराशाजनक आहे, अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.

विकास आराखड्यामध्ये खुली जागा, सार्वजनिक उपयोग, उद्याने, रस्ते, आर्दीसाठी निर्धारित केलेले जमिनीचे आरक्षण रद्द होणार नाही, यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणे भविष्यामध्ये तातडीने निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जमिनीचे आरक्षण रद्द झाल्याचे यापुढे आढळून आल्यास कठोर दंड ठोठावला जाईल, असेही न्यायालय म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय