शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जबाबदारीला न्याय देऊ शकत नसाल तर, नियोजन बंद करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:15 IST

Nagpur : हायकोर्टाचे राज्य सरकारवर कडक ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरांच्या विकास आराखड्यांमध्ये विविध उद्देशांकरिता निर्धारित केलेले जमिनींचे आरक्षण राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणांच्या निष्क्रियतेमुळे रद्द होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गंभीर भूमिका घेतली. तुम्ही जबाबदारीला न्याय देऊ शकत नसाल तर नियोजन विभागच बंद करून टाका, असे ताशेरे न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले.

नियोजन विभागाने ३० जून १९९८ रोजी मंजूर केलेल्या चंद्रपूर शहराच्या विकास आराखड्यामध्ये खुटाळा येथील जमीन (ख. क्र. ११३/७) उद्यानाकरिता आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर सक्षम प्राधिकरण म्हाडाने ही जमीन दहा वर्षांच्या कालावधीत संपादित करणे बंधनकारक होते. परंतु, म्हाडा २०२० पर्यंत झोपून राहिले. जमीन मालक शकिला खोब्रागडे यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी जमीन संपादनाची नोटीस पाठविल्यानंतर म्हाडाला जाग आली व त्यांनी ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारला ५२ कोटी रुपयांची मागणी केली.

परंतु, सरकारने ही रक्कम दिली नाही. परिणामी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील कलम १२७अनुसार या जमिनीचे आरक्षण डिसेंबर-२०२२ मध्ये रद्द झाले. करिता, खोब्रागडे यांनी ही जमीन परत मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व आधीचे अनुभव लक्षात घेता राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले. तसेच या जमिनीचे आरक्षण रद्द झाल्याचे जाहीर करून यासंदर्भात चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. 

केवळ राज्य सरकार व म्हाडाच्या निष्काळजीपणामुळे जमिनीचे आरक्षण रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली. हे चित्र अतिशय निराशाजनक आहे, अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.

विकास आराखड्यामध्ये खुली जागा, सार्वजनिक उपयोग, उद्याने, रस्ते, आर्दीसाठी निर्धारित केलेले जमिनीचे आरक्षण रद्द होणार नाही, यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणे भविष्यामध्ये तातडीने निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जमिनीचे आरक्षण रद्द झाल्याचे यापुढे आढळून आल्यास कठोर दंड ठोठावला जाईल, असेही न्यायालय म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय