शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 07:34 IST

आ. कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय गमतीचा झाला आहे.  २० मंत्री करायचे आहेत,  ५० लोक रांगेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने आतापासूनच विधान निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला. 

आ. कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय गमतीचा झाला आहे.  २० मंत्री करायचे आहेत,  ५० लोक रांगेत आहेत. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतच असतात. विस्तार केल्यावर भूकंप होईल, अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही, उलट इकडेच येतील. आपल्याला मंत्रिपदाची चिंता नाही.   मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार  दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.  शरद पवार हे  मजबूत नेते आहेत. मग, त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटे शपथ घ्यायला जाते, हे त्यांना माहीत नसेल का? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरShiv Senaशिवसेना