शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जर पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 8:54 PM

Nagpur News माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देगनिमी काव्याने व निधड्या छातीने सरकार पाडले

नागपूर : राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना मी त्यात सहभागी होणार नाही, असे ठरविले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. हेच नेते व पक्षामुळे मी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो होतो. माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या नागपुरात आगमनाप्रसंगी काढण्यात आलेल्या विजय रॅलीदरम्यान लक्ष्मीभुवन चौकातील छोटेखानी सभेदरम्यान ते बोलत होते.

फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. आपल्या सभेदरम्यान फडणवीस यांनी या सर्व कार्यकर्त्यांना परत जोमाने कामाला लागण्याचे संकेतच दिले. २०१९ साली शिवसेनेसोबत बहुमत आणले होते. मात्र, त्यांनी आमच्याशी बेईमानी केली व पाठीत खंजीर खुपसला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने व निधड्या छातीने आम्ही नवीन सरकार आणले. हे सरकार सहा महिने चालेल, असे भाकीत काही लोक वर्तवत आहेत. २०१४ मध्येदेखील याच लोकांनी एक वर्षदेखील सरकार चालणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण केली होती. पुढील निवडणुकीत आम्ही बहुमताचे सरकार आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

रोज संताप यायचा, वाईट वाटायचे

मागील अडीच वर्षांत राज्यात सगळीकडे दुराचार व अत्याचार वाढला होता. कुठेही प्रशासन दिसून येत नव्हते व सरकारी यंत्रणेत समन्वय नव्हता. राज्य कोण चालवत आहे हेच कळत नव्हते व महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती. विदर्भ-मराठवाड्याला सावत्र वागणूक दिली जात होती. विदर्भ विकास मंडळ बंद केले तर विजेची सबसिडी बंद केली. विकासकामांचा निधी दुसरीकडे पळविला होता. या प्रकारामुळे रोज संताप यायचा व वाईटदेखील वाटायचे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस