शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

By मंगेश व्यवहारे | Updated: October 3, 2023 17:11 IST

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय

नागपूर : २०२४ ची निवडणूक ही सामन्य निवडणूक नाही. लोकशाही, संविधानाला संपविणाऱ्या आणि गणतंत्राचे तुकडे करणाऱ्या भाजप व आरएसएस विरोधातील महत्वाचा लढा आहे. २०२४ च्या निवडणुका हातातून गेल्यास पुढचे २५ वर्ष पर्याय राहणार नाही. भाजप आणि आरएसएसच्या जबड्यातून देशाला वाचवायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. योगेंद्र यादव यांनी केले.

लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन मंच, आम्ही सारे भारतीय आणि धनवटे नॅशनल कॉलेज मास कम्युनिकेश विभागातर्फे मंगळवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी’ या विषयांवर आयोजित जाहीर व्याख्यानात योगेंद्र यादव बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय पक्षाच्या इंडिया आघाडीत कितीही वाद असले तरी, तोच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.

२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने लोकशाहीचीच हत्या, संविधानातील समाजवाद, धर्मनिरेपक्षाता, सामाजिक न्याय, एकात्मता संविण्याचे आणि गणतंत्रला तोडण्याचे काम केले आहे. चीन व पाकिस्तानपासून जेवढा धोका या देशाला नाही, तेवढा धोका भाजप व आरएसएसपासून असल्याचे ते म्हणाले. भारत मातेच्या दोन पुत्रांमध्ये दंगे पसरविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनिपूरमध्ये सरकारने सिव्हील वार सुरू केला आहे. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने या सरकारला हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नागपूरकरांनो माणूस बघू नका, देशातील भाजपच्या सत्तेला आणि आरएसएस विचाराला पळविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य ओ.एस. देशमुख, यांच्यासह अशोक सरस्वती, अरुण गाडे, प्रा. जावेद पाशा, अरुण लाटकर, अरुण वनकर, श्याम पांढरीपांडे, जम्मू आनंद, सुरेश अग्रवाल, देविदास घोडेस्वार, जगजितसिंग आदी उपस्थित होते.

- नागपूरला देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार करणारे म्हणून ओळखले पाहिजे

सद्या नागपूरातून एक विचार देशात पसरतोय. पण हा विचार देश तोडणारा आहे. हा विचार नागपूरची ओळख बनू देवू नका, नागपूर तर बहूजन आंदोलनाची भूमी आहे. नवीन उर्जा देणारी, क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे नागपूरची ओळख देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार म्हणून झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाnagpurनागपूर