शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

By मंगेश व्यवहारे | Updated: October 3, 2023 17:11 IST

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय

नागपूर : २०२४ ची निवडणूक ही सामन्य निवडणूक नाही. लोकशाही, संविधानाला संपविणाऱ्या आणि गणतंत्राचे तुकडे करणाऱ्या भाजप व आरएसएस विरोधातील महत्वाचा लढा आहे. २०२४ च्या निवडणुका हातातून गेल्यास पुढचे २५ वर्ष पर्याय राहणार नाही. भाजप आणि आरएसएसच्या जबड्यातून देशाला वाचवायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. योगेंद्र यादव यांनी केले.

लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन मंच, आम्ही सारे भारतीय आणि धनवटे नॅशनल कॉलेज मास कम्युनिकेश विभागातर्फे मंगळवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी’ या विषयांवर आयोजित जाहीर व्याख्यानात योगेंद्र यादव बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय पक्षाच्या इंडिया आघाडीत कितीही वाद असले तरी, तोच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.

२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने लोकशाहीचीच हत्या, संविधानातील समाजवाद, धर्मनिरेपक्षाता, सामाजिक न्याय, एकात्मता संविण्याचे आणि गणतंत्रला तोडण्याचे काम केले आहे. चीन व पाकिस्तानपासून जेवढा धोका या देशाला नाही, तेवढा धोका भाजप व आरएसएसपासून असल्याचे ते म्हणाले. भारत मातेच्या दोन पुत्रांमध्ये दंगे पसरविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनिपूरमध्ये सरकारने सिव्हील वार सुरू केला आहे. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने या सरकारला हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नागपूरकरांनो माणूस बघू नका, देशातील भाजपच्या सत्तेला आणि आरएसएस विचाराला पळविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य ओ.एस. देशमुख, यांच्यासह अशोक सरस्वती, अरुण गाडे, प्रा. जावेद पाशा, अरुण लाटकर, अरुण वनकर, श्याम पांढरीपांडे, जम्मू आनंद, सुरेश अग्रवाल, देविदास घोडेस्वार, जगजितसिंग आदी उपस्थित होते.

- नागपूरला देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार करणारे म्हणून ओळखले पाहिजे

सद्या नागपूरातून एक विचार देशात पसरतोय. पण हा विचार देश तोडणारा आहे. हा विचार नागपूरची ओळख बनू देवू नका, नागपूर तर बहूजन आंदोलनाची भूमी आहे. नवीन उर्जा देणारी, क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे नागपूरची ओळख देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार म्हणून झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाnagpurनागपूर